शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 12:33 IST

मोठ्या सभा होऊनही भाजपच्या जागा घटल्या

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होऊन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे या सभा चांगल्याच गाजल्या. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या, तरीदेखील २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटून सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा न होता या निवडणुकीत काँग्रेसने आपले खाते उघडले तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ठिकाणची जागा गमवून दुसऱ्या ठिकाणी विजय मिळविला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कायम राहिली.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावात सभा झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची चाळीसगाव येथे तर केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची सावदा, फैजपूर येथे सभा झाली. सोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रावेरला तर गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांची जळगावला सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पारोळा, शेंदुर्णी, चाळीसगाव, येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिचणीस अमोल मिटकरी भडगाव, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, खासदार अमोल कोल्हे यांची एरंडोल, बोदवड, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांची पाचोरा येथे तर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची फैजपूर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची चाळीसगाव येथे सभा झाली होती.आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेºया‘३७०’ पुन्हा लावून दाखवा - मोदीजम्मू-काश्मिरला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम भाजपने केले. विरोधक मात्र शत्रू राष्टÑाची भाषा करीत आहेत. हिंमत असेल तर ‘३७०’ पुन्हा लावण्याचे आश्वासन द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले होते.पवारांची मानसिकता ढासळली - मुख्यमंत्री फडणवीसउत्तर आम्हालाही देता येते. मात्र हातवारे करायला आम्ही काही ‘नटरंग’ नाही’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. पवारांची मानसिकता ढासळल्याने असे हातवारे करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.५ वर्षात काय केले ? - शरद पवारसत्ता आल्यानंतर आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मग पाच वर्षे त्यांनी काय केले. मला घरी जाऊन सातबारा कोरा झाला की नाही हे पहावे लागेल, असा चिमटा ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.मुस्लिमांना आरक्षण का नाही - खासदार असदुद्दीन ओवेसीमहाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, मग मुस्लीम समाजाला का आरक्षण देत नाही. हा मुस्लीम समाजावार अन्याय होत आहे, अशी टीका एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर केली.भाजपच्या सर्वाधिक सभा होऊन जागा घटल्याप्रचारादरम्यान सर्वाधिक सभा भाजपच्या नेत्यांच्या झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांच्या सभा झाल्या. असे असले तरी २०१४मध्ये जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी सहा जागांवर विजय मिळविणाºया भाजपच्या या निवडणुकीत जागा वाढण्यापेक्षा दोन जागा घटल्या. यामध्ये मुक्ताईनगर, रावेर या दोन जागा भाजपने गमावल्या.काँग्रेसची सभा न होता उघडले खाते२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची एकही जागा निवडणून आली नव्हती. या वेळी काँग्रेसने रावेर मतदार संघातून उमेदवार दिले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा झाली नाही. तरीदेखील काँग्रेसने ही जागा जिंकून जिल्ह्यात या वेळी आपले खाते उघडले.राष्ट्रवादीने एक गमावली, एक जिंकलीराष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात १० ठिकाणी उमेदवार दिले. त्यांच्या प्रचारासाठी दिग्गजांच्या सभा झाल्या. २०१४मध्ये एरंडोल मतदार संघाच्या एकमेव ठिकाणी विजय मिळविणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी ही जागा गमावली. मात्र अमळनेर मतदार संघात विजय मिळवित जिल्ह्यातील एक जागा कायम राखली.

टॅग्स :Jalgaonजळगाव