शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 12:33 IST

मोठ्या सभा होऊनही भाजपच्या जागा घटल्या

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होऊन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे या सभा चांगल्याच गाजल्या. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या, तरीदेखील २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटून सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा न होता या निवडणुकीत काँग्रेसने आपले खाते उघडले तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ठिकाणची जागा गमवून दुसऱ्या ठिकाणी विजय मिळविला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कायम राहिली.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावात सभा झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची चाळीसगाव येथे तर केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची सावदा, फैजपूर येथे सभा झाली. सोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रावेरला तर गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांची जळगावला सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पारोळा, शेंदुर्णी, चाळीसगाव, येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिचणीस अमोल मिटकरी भडगाव, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, खासदार अमोल कोल्हे यांची एरंडोल, बोदवड, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांची पाचोरा येथे तर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची फैजपूर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची चाळीसगाव येथे सभा झाली होती.आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेºया‘३७०’ पुन्हा लावून दाखवा - मोदीजम्मू-काश्मिरला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम भाजपने केले. विरोधक मात्र शत्रू राष्टÑाची भाषा करीत आहेत. हिंमत असेल तर ‘३७०’ पुन्हा लावण्याचे आश्वासन द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले होते.पवारांची मानसिकता ढासळली - मुख्यमंत्री फडणवीसउत्तर आम्हालाही देता येते. मात्र हातवारे करायला आम्ही काही ‘नटरंग’ नाही’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. पवारांची मानसिकता ढासळल्याने असे हातवारे करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.५ वर्षात काय केले ? - शरद पवारसत्ता आल्यानंतर आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मग पाच वर्षे त्यांनी काय केले. मला घरी जाऊन सातबारा कोरा झाला की नाही हे पहावे लागेल, असा चिमटा ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.मुस्लिमांना आरक्षण का नाही - खासदार असदुद्दीन ओवेसीमहाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, मग मुस्लीम समाजाला का आरक्षण देत नाही. हा मुस्लीम समाजावार अन्याय होत आहे, अशी टीका एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर केली.भाजपच्या सर्वाधिक सभा होऊन जागा घटल्याप्रचारादरम्यान सर्वाधिक सभा भाजपच्या नेत्यांच्या झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांच्या सभा झाल्या. असे असले तरी २०१४मध्ये जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी सहा जागांवर विजय मिळविणाºया भाजपच्या या निवडणुकीत जागा वाढण्यापेक्षा दोन जागा घटल्या. यामध्ये मुक्ताईनगर, रावेर या दोन जागा भाजपने गमावल्या.काँग्रेसची सभा न होता उघडले खाते२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची एकही जागा निवडणून आली नव्हती. या वेळी काँग्रेसने रावेर मतदार संघातून उमेदवार दिले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा झाली नाही. तरीदेखील काँग्रेसने ही जागा जिंकून जिल्ह्यात या वेळी आपले खाते उघडले.राष्ट्रवादीने एक गमावली, एक जिंकलीराष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात १० ठिकाणी उमेदवार दिले. त्यांच्या प्रचारासाठी दिग्गजांच्या सभा झाल्या. २०१४मध्ये एरंडोल मतदार संघाच्या एकमेव ठिकाणी विजय मिळविणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी ही जागा गमावली. मात्र अमळनेर मतदार संघात विजय मिळवित जिल्ह्यातील एक जागा कायम राखली.

टॅग्स :Jalgaonजळगाव