शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

स्वाईन फ्लूने घेतला शहरात बळी

By admin | Updated: January 28, 2015 13:49 IST

दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे.

जळगाव : दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे. शहरातील चैत्रबन कॉलनीतील श्रीकांत मदनराव विधाते(५४) यांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात २३ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.विधाते व्यावसायिक असून त्या निमित्ताने मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये त्यांची ये-जा होती. या शहरांमध्ये स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान विधाते स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या संपर्कात आले. सर्दी, खोकला आणि ताप आदी लक्षणे असल्याने ते १६ जानेवारी रोजी डॉ.सुनीलदत्त चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र १९ जानेवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर २२ जानेवारीपर्यंत उपचार करण्यात आले. मात्र सुधारणा झाली नाही. गणपती हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांचे रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यानंतर २३ जानेवारी रोजी विधाते यांना एअर अँम्बुलन्सने मुंबई येथे पाठविण्यात आले. तेथे मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयात १.४५ मिनिटांनी स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी ५.४0 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.विधाते यांचे प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्याच्या अहवालानुसार विधाते यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी दिली. त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयाकडून मंगळवारी माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातर्फे खबरदारी घेण्यात येत असून उपाय योजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

----------

वराह पालन करणार्‍यांना सात दिवसांचा अल्टीमेटम नियमबाह्यपणे वराहपालन करणार्‍या नागरिकांना मनपा आरोग्य विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून हे वराह ७ दिवसांच्या आत शहराबाहेर हलविण्याचे आदेश दिले आहेत. या वराहांमुळे नागरिकांच्या आरोग्यास उपद्रव होत असून नागरिकांनी लावलेल्या वृक्षांचे सुद्धा नुकसान होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. मनपा अधिनियम १९४९ मधील कलम ३३६(२) नुसार बेकायदा वराह पालन करणे गुन्हा आहे. मनपा ती जनावरे ताब्यात घेईल असा इशारा दिला आहे. कुटुंबीयांचेही घेतले नमुने; आरोग्य विभाग सतर्क स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली जात आहे. विधाते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या १0 जणांच्या पथकाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात जणांचे नमुने घेतले आहेत. चैत्रबन कॉलनीची लोकसंख्या ४ हजार ४६५ असून त्यापैकी १ हजार ११८ कुटुंबांना आरोग्य विभागाच्या पथकाने भेटी दिल्या आहेत. या कॉलनीतील नागरिकांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. सहा नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.