शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वेद : ऋषी आणि कृषी संस्कृतीेचे उद्गान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 19:45 IST

चार वेद़ जणू काही चार पुरूषार्थ़ ऋग्वेदातला ऋक् शब्द ऋ (ऋच्) या धातुपासून उत्पन्न झालाय़ ऋ म्हणजे गती, ज्ञान, प्रकाश. यजुर्वेदातला यजुस शब्द यज् या धातुपासून उत्पन्न झालाय़ यजुस म्हणजे निष्काम कर्म वा यज्ञ़ अथर्वातला अथर्व म्हणजे अकुटिलता़ सामवेदातला साम म्हणजे समत्व़ वेद सनातन आहेत़ सनातन म्हणजे नित्य नूतऩ यात ज्ञान आहे़ विज्ञान आहे़ तत्त्वज्ञान आहे़ अध्यात्म आहे़ जीवन आहे़ साहित्य आहे़ याचा आपल्या संवेदनशील लेखणीतून एक तलस्पर्शी शोध ‘वेदातील साहित्य सौंदर्य’ या लेखमालेच्या माध्यमातून घेताहेत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ़विश्वास पाटील़

वेदातला ऋषी कलकल निनाद करणाऱ्या वेगवान सरितांना बघतो़ पर्वत प्रदेशातून धावत येणाºया या नद्या़ त्या स्वच्छ जलधारा बघून त्याचं अंत:करण उचंबळून येतं़ दूधानं स्तनभार सहन न होणाºया गाईसारख्या या सरिता़ या हंबरत येताहेत असं त्याला वाटतं़ गाई कशा स्नेह वत्सल़ नद्या कशा मातृरूपी़ ऋषी या नद्यांना विनवतो, ‘हे सरितांनो, तुम्ही मला धेनुसारख्या वाटताहात़ तुमचं जळ हे दूधाप्रमाणं़ ते आहे पावऩ ते मधुर आहे़ गाई का कधी आपल्या वासरांना सोडून वनांतरी रहातील? तशाच तुम्हीही़ तुम्ही का कधी पर्वतरांगांशिवाय राहू शकाल? तुम्ही तृषार्त लेकरांसाठी धावत येताहात़ तुम्हाला प्रमाण असो़ऋषी या नावांनी देव ओळखतो़ देव शब्दाचा अर्थही व्यापक़ सूर्य म्हणजे प्रेरणा़ जळ म्हणजे श्रद्धा़ गृहदेव म्हणजे स्थिरता़ वन देवता म्हणजे स्वातंत्र्य़ असे शब्द आणि असे अर्थ़ यजुर्वेद या शब्दाचा अर्थच तर बघा़ यजुर्वेद म्हणजे गतिशील आकाश़ यातले मंत्र पद्याच्या बंधनातून मुक्त आहेत़ याचा विषय यज्ञ़ यज्ञाचा अर्थ व्यापक़ अग्निसाठी किती विविध नावं? बघा तरी एकदा़ एक नाव आहे जातवेद़ म्हणजे उत्पन्न करण्यातला विशेषज्ञ़ एक नाव आहे पूषा़ म्हणजे पोषण देणारा़ एक नाव आहे यम़ म्हणजे अनुशासन करणारा़ अग्निचं असं दर्शन ऋषी प्रतिभेला झालं़ अग्नी हा अत्यंत मनोरम़ तो औषधंींना पोषण देणारा़ विलक्षण वर्णाच्या ज्वालांनी युक्त ़ सदा नित्य़ तो नवीन बाळकासारखा दिसतो़ तो स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी नांदतो़ तो झगमगत्या गर्भासारखा़ तो अंध:कार घालवणाºया मातेसारखा़पहिल्या अध्यायाच्या आरंभीची ही चर्चा़ अन्नाच्या प्राप्तीसाठी सवितादेवानं आपल्याला अगे्रसर करावं़ आपणास तेजस्वी बनता यावं़ आपली शक्ती विनाशकारी नसावी़ उन्नतीशील असावी़ चोर आपले निर्धारक नसावेत़ आपण दुष्ट पुरूषांच्या संरक्षणाखाली राहू नये़ आपला निवास मातृभूमीच्या रक्षकांच्या छत्रछायेखाली असावा़ सज्जनांची संख्या वाढो़ राजाचा राज्याभिषेक व्हायचा़ त्याच्या पाठीवरून सिंचन करणाºया जलधारा वहायच्यात़ त्या बघून ऋषी म्हणतो़ जणू काही पर्वताच्या पृष्ठभागावरून वहाणाºया या सरिता़सामवेद तर गान विद्येचा वेद ़ गीतेने ‘वेदात सामवेद मी़’ असं म्हटलंय़ सामवेदाचा केवढा महिमा गाईलाय़ वेद ज्ञान आहे़ साम गान आहे़ गान हे भावभावनांशी समांतऱ यात भावतरंगांचा दिव्य उल्हास नांदता़ यात आढळून येते मनाची एकतान नादमुद्रा़ गायनानं माणसाचं दु:ख कमी केलंय़ स्वर साधना योगिजनांनाही भावरम्य बनवते़ संगीत म्हणजे प्रीत़संगीत म्हणजे आत्म्याची उन्नती़ स्वर्गीय सौंदर्याचं सगुण साकार रूप़ संगीत ही साधना़ संगीत ही उपासना़ संगीत हा ध्यानयोग़ वेदातील सारे मंत्र अपूर्व़ यात स्वर वसतो़ ताल नांदतो़ लय सजते़ छंद विहरतो़ गती नृत्याकार असत़े स्वर-चिकित्सा अनुपमेय़ यात विविध राग़ यात सजल्यात नृत्यमुद्रा़ यात नयनरम्य भाव़ या तत्त्वांनी संगीत सजलंय़ एकूण श्रुती बावीस़ एकूण स्वर सात़ षड्ज, ऋषभ, गांधार, पंचम, धैवत आणि निषाद़ यातून श्रुतींची मांडणी सजलीय़ या गुणांमुळं सामवेदाला पुष्प मानलं गेलं़-प्राचार्य डॉ़विश्वास पाटील़, शहादा, जि.नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार