शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा व्रत बुधवारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:24 IST

सूर्योदयानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे

ठळक मुद्देसकाळी ८.१२ पर्यंत चतुर्दशीचा मुहूर्तफांदी तोडून पूजन करणे टाळा

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि. जळगाव : पतीस दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या वृक्षाचे पूजन व उपवासाला अनन्य महत्त्व आहे. मात्र यंदा वटसावित्री पौर्णिमा बुधवारी की गुरुवारी हा थोडा संभ्रम निर्माण झाला असला तरी २७ जून रोजी बुधवारीच वटपौर्णिमा साजरी होत आहे.बुधवारी सकाळी ८ वा. १२ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. व गुरुवारी सकाळी १० वा.२३ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे दि.२७ रोजी बुधवारी चतुर्दशी ८ वा.१३ मी.पर्यंत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक असल्याने बुधवारीच वटपौर्णिमा पूजन व उपवास करावा. बुधवारी सकाळी चतुर्दशी तिथी असली तरी सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे दीड पर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे असा खुलासा दाते पंचांगात दिलेला आहे.वटवृक्षाचे यादिवशी महिला सुत गुंडाळून पूजन करतात. ऋतुफल व धान्यासह सौभाग्य वाटान अर्पण करतात.पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करीत पतीस दीर्घायुष्य, आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येते. कथा वाचन व उपवास केला जातो.फांदी तोडून पूजन करणे टाळामूळासकट असलेल्या वृक्षाचे पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजन करू नये. वडाच्या झाडाजवळ जावून पूजन करणे शक्य नसल्यास त्यापेक्षा मूळासकट असलेल्या वटरोपाचे घरी आणून पूजन करून त्याची लागवड करीत संवर्धन करा. मात्र फांदी तोडून पूजन करणे टाळा.व्रताची आख्यायिकासावित्री अश्वपतीची कन्या आहे. ती सत्यवानाला पती म्हणून निवडते. तो अल्पायुशी असल्याची भविष्यवाणी नारदमुनी वर्तवतात. मात्र सावित्री हे माहीत असताना सत्यवानाशी विवाह करते. त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते. वटवृक्षाखाली त्याला मृत्यू येतो. यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे पतीबरोबर जावू लागली. पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने प्रसन्न होत तिला वर मागण्यास सांगितले व सावित्रीने तीन वर मागितले. सासू-सासऱ्यांची दृष्टी व राज्य परत मागितले व पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तू म्हटले. सावित्री वटवृक्षाजवळ येते. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आलेले असतात. सावित्रीचे सौभाग्य टिकून राहते व ती अखंड सौभाग्यवती बनते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे पूजनाला महत्त्व आहे. सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची देवता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव