शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा व्रत बुधवारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:24 IST

सूर्योदयानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे

ठळक मुद्देसकाळी ८.१२ पर्यंत चतुर्दशीचा मुहूर्तफांदी तोडून पूजन करणे टाळा

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि. जळगाव : पतीस दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या वृक्षाचे पूजन व उपवासाला अनन्य महत्त्व आहे. मात्र यंदा वटसावित्री पौर्णिमा बुधवारी की गुरुवारी हा थोडा संभ्रम निर्माण झाला असला तरी २७ जून रोजी बुधवारीच वटपौर्णिमा साजरी होत आहे.बुधवारी सकाळी ८ वा. १२ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. व गुरुवारी सकाळी १० वा.२३ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे दि.२७ रोजी बुधवारी चतुर्दशी ८ वा.१३ मी.पर्यंत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक असल्याने बुधवारीच वटपौर्णिमा पूजन व उपवास करावा. बुधवारी सकाळी चतुर्दशी तिथी असली तरी सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे दीड पर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे असा खुलासा दाते पंचांगात दिलेला आहे.वटवृक्षाचे यादिवशी महिला सुत गुंडाळून पूजन करतात. ऋतुफल व धान्यासह सौभाग्य वाटान अर्पण करतात.पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करीत पतीस दीर्घायुष्य, आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येते. कथा वाचन व उपवास केला जातो.फांदी तोडून पूजन करणे टाळामूळासकट असलेल्या वृक्षाचे पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजन करू नये. वडाच्या झाडाजवळ जावून पूजन करणे शक्य नसल्यास त्यापेक्षा मूळासकट असलेल्या वटरोपाचे घरी आणून पूजन करून त्याची लागवड करीत संवर्धन करा. मात्र फांदी तोडून पूजन करणे टाळा.व्रताची आख्यायिकासावित्री अश्वपतीची कन्या आहे. ती सत्यवानाला पती म्हणून निवडते. तो अल्पायुशी असल्याची भविष्यवाणी नारदमुनी वर्तवतात. मात्र सावित्री हे माहीत असताना सत्यवानाशी विवाह करते. त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते. वटवृक्षाखाली त्याला मृत्यू येतो. यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे पतीबरोबर जावू लागली. पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने प्रसन्न होत तिला वर मागण्यास सांगितले व सावित्रीने तीन वर मागितले. सासू-सासऱ्यांची दृष्टी व राज्य परत मागितले व पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तू म्हटले. सावित्री वटवृक्षाजवळ येते. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आलेले असतात. सावित्रीचे सौभाग्य टिकून राहते व ती अखंड सौभाग्यवती बनते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे पूजनाला महत्त्व आहे. सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची देवता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव