शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शास्त्रवचनानुसार वटपौर्णिमा व्रत बुधवारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:24 IST

सूर्योदयानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे

ठळक मुद्देसकाळी ८.१२ पर्यंत चतुर्दशीचा मुहूर्तफांदी तोडून पूजन करणे टाळा

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि. जळगाव : पतीस दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमा व्रत करतात. ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी वडाच्या वृक्षाचे पूजन व उपवासाला अनन्य महत्त्व आहे. मात्र यंदा वटसावित्री पौर्णिमा बुधवारी की गुरुवारी हा थोडा संभ्रम निर्माण झाला असला तरी २७ जून रोजी बुधवारीच वटपौर्णिमा साजरी होत आहे.बुधवारी सकाळी ८ वा. १२ मिनिटांपर्यंत चतुर्दशी असून त्यानंतर पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. व गुरुवारी सकाळी १० वा.२३ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे. सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे, असे शास्त्रवचन आहे. त्यामुळे दि.२७ रोजी बुधवारी चतुर्दशी ८ वा.१३ मी.पर्यंत असल्याने याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटीपेक्षा अधिक असल्याने बुधवारीच वटपौर्णिमा पूजन व उपवास करावा. बुधवारी सकाळी चतुर्दशी तिथी असली तरी सूर्योदयानंतर मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी सुमारे दीड पर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे असा खुलासा दाते पंचांगात दिलेला आहे.वटवृक्षाचे यादिवशी महिला सुत गुंडाळून पूजन करतात. ऋतुफल व धान्यासह सौभाग्य वाटान अर्पण करतात.पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करीत पतीस दीर्घायुष्य, आरोग्य व सुखसमृद्धीची प्रार्थना करण्यात येते. कथा वाचन व उपवास केला जातो.फांदी तोडून पूजन करणे टाळामूळासकट असलेल्या वृक्षाचे पूजनाला अनन्य महत्त्व आहे. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजन करू नये. वडाच्या झाडाजवळ जावून पूजन करणे शक्य नसल्यास त्यापेक्षा मूळासकट असलेल्या वटरोपाचे घरी आणून पूजन करून त्याची लागवड करीत संवर्धन करा. मात्र फांदी तोडून पूजन करणे टाळा.व्रताची आख्यायिकासावित्री अश्वपतीची कन्या आहे. ती सत्यवानाला पती म्हणून निवडते. तो अल्पायुशी असल्याची भविष्यवाणी नारदमुनी वर्तवतात. मात्र सावित्री हे माहीत असताना सत्यवानाशी विवाह करते. त्याच्या मृत्यूची वेळ येऊन ठेपते. वटवृक्षाखाली त्याला मृत्यू येतो. यमराज सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे पतीबरोबर जावू लागली. पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. अखेर यमाने प्रसन्न होत तिला वर मागण्यास सांगितले व सावित्रीने तीन वर मागितले. सासू-सासऱ्यांची दृष्टी व राज्य परत मागितले व पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने तथास्तू म्हटले. सावित्री वटवृक्षाजवळ येते. सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आलेले असतात. सावित्रीचे सौभाग्य टिकून राहते व ती अखंड सौभाग्यवती बनते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या वृक्षाचे पूजनाला महत्त्व आहे. सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची देवता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव