शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
4
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
5
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
6
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
7
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
8
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
9
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
10
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
11
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
12
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
13
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
14
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
15
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
16
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
17
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
18
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
19
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
20
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

जळगावात ७ ते १० डिसेंबर दरम्यान होणार वसुंधरा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 20:23 IST

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे

ठळक मुद्देसंयोजन समितीच्या बैठकीत निर्णय व्याघ्र परिषद व पर्यावरण साहित्य संमेलन महोत्सवाचे आकर्षण तीन समित्यांची स्थापना

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१५-किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन जळगावात ७ ते १० डिसेंबर करण्यात येणार आहे. रविवारी पर्यावरण शाळा येथे घेण्यात आलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय व्याघ्र परिषद व राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन या  महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अभय उजागरे होते. यावेळी महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, अर्चना उजागरे, सविता भोळे, उमेश इंगळे, चेतना नन्नवरे, अमन गुजर, वर्धमान भंडारी आदींसह जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

नदी वाचवा,जीवन वाचवासमर्र्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा, रोटरी क्लब आॅफ ईस्ट व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जात असते. यावर्षी वसुंधरा महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना ‘नदी वाचवा,जीवन वाचवा’ अशी असून यावर आधारित माहितीपट आणि उपक्रमांचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.

विविध स्पर्धांचे आयोजनवसुंधरा महोत्सवानिमित्त निसर्ग संवर्धन व पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया कार्यक र्ते व संस्थांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लघुपट, माहितीपट, निसर्ग, वन्यजीवन छायाचित्र स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये माहितीपटाचे सादरीकरण, व्याख्याने व चर्चासत्रांचे देखील महोत्सवादरम्यान आयोजन केले जाणार आहे.

तीन समित्यांची स्थापनामहोत्सवासाठी तीन समित्यांची स्थापना करण्यात आली असून, वसुंधरा कार्यक्रम आणि उपक्रम समितीत वासुदेव वाढे, सविता भोळे, सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे, भागवत कोळी यांचा समावेश आहे. व्याघ्र परिषदेत अभय उजागरे, बाळकृष्ण देवरे, अमन गजर, राहुल सोनवणे, योगेश गालफाडे हे आहेत. तर महाराष्ट राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीत राजेंद्र नन्नवरे, अर्चना उजागरे, उमेश इंगळे, इम्रान तडवी यांचा समावेश आहे. यानंतर अनेक उपसमित्यांची रचना करण्यात येणार आहे. समाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी या महोत्सावात सहभाग घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.