शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:42 IST

कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे

विजयकुमार सैतवालजळगाव : कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. परिणामी कडधान्याचे उत्पादन कमी होऊन त्याच्या झळा बळीराजासह उद्योग, व्यापार क्षेत्र तसेच पर्यायाने सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.पावसाचा लहरीपणा म्हणणे आता नित्याचे झाले आहे. मात्र यंदादेखील अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने यास पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हे कोणी समजून घेण्यास तयार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे आॅक्टोबर महिन्यापासूनच समोर येऊ लागले असून खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामाचीदेखील आता चिंता लागली आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे यंदाही केवळ संकट कायम राहणार नसून ते वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहे.पाणी टंचाईसोबतच पिकांवर परिणाम होऊन महागाईच्या झळाही जाणवू लागल्या असून उद्योग क्षेत्रही यामुळे बाधीत झाले आहे. कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यामुळे डाळ उद्योग पुन्हा एकदा संकटात ओढावून डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे.जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक असून यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे. यावरूनच कमी पावसाचा किती मोठा परिणाम उद्योगांवर होत आहे, हे स्पष्ट होते.व्यापार क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली असून सध्या डाळींना मागणी असली तरी भाववाढ कायम राहिल्यास खरेदीदार हात आखडता घेतील व व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सामान्यांचा विचार केला तर डाळीसाठी ग्राहकांना ८ ते ९ रुपये प्रती किलो जादा मोजावे लागत आहे. मुगाची डाळ ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाची डाळही ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळ ५४०० ते ५५५० रुपये तर तूरडाळ ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव