शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:42 IST

कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे

विजयकुमार सैतवालजळगाव : कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. परिणामी कडधान्याचे उत्पादन कमी होऊन त्याच्या झळा बळीराजासह उद्योग, व्यापार क्षेत्र तसेच पर्यायाने सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.पावसाचा लहरीपणा म्हणणे आता नित्याचे झाले आहे. मात्र यंदादेखील अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने यास पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हे कोणी समजून घेण्यास तयार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे आॅक्टोबर महिन्यापासूनच समोर येऊ लागले असून खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामाचीदेखील आता चिंता लागली आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे यंदाही केवळ संकट कायम राहणार नसून ते वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहे.पाणी टंचाईसोबतच पिकांवर परिणाम होऊन महागाईच्या झळाही जाणवू लागल्या असून उद्योग क्षेत्रही यामुळे बाधीत झाले आहे. कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यामुळे डाळ उद्योग पुन्हा एकदा संकटात ओढावून डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे.जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक असून यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे. यावरूनच कमी पावसाचा किती मोठा परिणाम उद्योगांवर होत आहे, हे स्पष्ट होते.व्यापार क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली असून सध्या डाळींना मागणी असली तरी भाववाढ कायम राहिल्यास खरेदीदार हात आखडता घेतील व व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सामान्यांचा विचार केला तर डाळीसाठी ग्राहकांना ८ ते ९ रुपये प्रती किलो जादा मोजावे लागत आहे. मुगाची डाळ ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाची डाळही ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळ ५४०० ते ५५५० रुपये तर तूरडाळ ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव