शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

वरुणराजाच्या अवकृपेच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:42 IST

कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे

विजयकुमार सैतवालजळगाव : कमी पावसामुळे यंदा सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण संकट असताना खरीप हंगामावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. परिणामी कडधान्याचे उत्पादन कमी होऊन त्याच्या झळा बळीराजासह उद्योग, व्यापार क्षेत्र तसेच पर्यायाने सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.पावसाचा लहरीपणा म्हणणे आता नित्याचे झाले आहे. मात्र यंदादेखील अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने यास पर्यावरणात वाढता मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हे कोणी समजून घेण्यास तयार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी पावसामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे आॅक्टोबर महिन्यापासूनच समोर येऊ लागले असून खरीप हातचा गेल्याने रब्बी हंगामाचीदेखील आता चिंता लागली आहे. अल्प पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे यंदाही केवळ संकट कायम राहणार नसून ते वाढणार असल्याचे संकेत दिले जात आहे.पाणी टंचाईसोबतच पिकांवर परिणाम होऊन महागाईच्या झळाही जाणवू लागल्या असून उद्योग क्षेत्रही यामुळे बाधीत झाले आहे. कमी पावसामुळे कडधान्याची आवक घटल्याने त्याचा फटका दालमिललादेखील बसू लागला असून दालमिलचे उत्पादन तब्बल २५ टक्क्याने घटले आहे. त्यामुळे डाळ उद्योग पुन्हा एकदा संकटात ओढावून डाळींचे भावदेखील वाढू लागले आहे.जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील डाळ उद्योग हा महत्त्वाचा घटक असून यंदा वरुणराजाच्या अवकृपेने या उद्योगावर मंदीचे ढग ओढावले जात आहे. जळगावात दररोज साधारण ५ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होते. मात्र सध्या कडधान्याची आवक घटल्याने या उत्पादनात थेट २५ टक्क्याने घट झाली आहे. ५ हजार क्विंटलपैकी आता दररोज ३७०० ते ३७५० क्विंटल डाळीची निर्मिती होत आहे. यावरूनच कमी पावसाचा किती मोठा परिणाम उद्योगांवर होत आहे, हे स्पष्ट होते.व्यापार क्षेत्रावरदेखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली असून सध्या डाळींना मागणी असली तरी भाववाढ कायम राहिल्यास खरेदीदार हात आखडता घेतील व व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.सामान्यांचा विचार केला तर डाळीसाठी ग्राहकांना ८ ते ९ रुपये प्रती किलो जादा मोजावे लागत आहे. मुगाची डाळ ७१०० ते ७६५० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाची डाळही ५३०० ते ५३५० रुपये प्रती क्विंटल, हरभरा डाळ ५४०० ते ५५५० रुपये तर तूरडाळ ५७०० ते ६१५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव