शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

प्रत्येक गावात साकारणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:13 IST

प्लॅस्टीक बंदीवर देणार भर

जळगाव : पर्यावरणाचा समतोल हाच खरा शाश्वत विकास आहे, त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, यासाठी आता प्रत्येक गावात वनराई साकारण्याची संकल्पना साकारणार आहोत़ यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन वर्षांपर्यंत वृक्षसंगोपनाचे वेतनही दिले जाईल, यासह प्रत्येक ग्रामपंचयातीने प्लास्टीक बंदीवर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़ पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली़भौतिक विकास कितीही साधला तरी तरी पर्यावरणाची संसाधने, स्त्रोत यांचा समतोल जोपर्यंत राखला जात नाही तोपर्यंत हा भौतिक विकास हा शाश्वत नसेल़यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे़ शासनाच्या उपयायोजना आहेतच मात्र ही एक लोकचळवळ व्हावी, जंगल वाचविण्यासाठी लोकांनी जागृत होऊन चळवळ सुरू करावी, जंगल वाचले तर नदी, नाल्यांना बारमाही पाणी येईल, जलस्त्रोत आटणार नाही़ यासाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे़ पाण्याचे शाश्वत साठे तयार होणे गरजेचे आहे़ त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही़, असेही सीईओ डॉ़ पाटील यांनी सांगितले़सेंद्रीय शेतीकडे वळावेपिंकावर फवारण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या वापरात समतोल हवा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ पेस्टीस्टाईड मुळे जलप्रदुषण तर होते, भाजीपाल्यावरही परिणाम होतो, यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे़ जमिनही नापिक होते़ त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे़ अनेक राज्यांमध्ये पूर्णत: सेंद्रीय शेती केली जाते़ग्रामपंचायतींना सूचनाआपल्या गावात प्लॅस्टीक पिशव्या तसेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीच सर्व ग्रामपंचातींना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ या व्यतिरिक्त गावात कमीत कमी ५० टक्के शोषखड्डे करावे, जेणेकरून भूजल पातळीत वाढ होईल, रेनवॉटर हार्व्हेस्टींगसाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासंदर्भातही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे़ घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासह अजैविक कचरा निर्माण होणाºया प्लास्टीकवर पूर्णत: बंदी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ यात लोकसहभागाला अधिक महत्त्व असल्याचे डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव