शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

प्रत्येक गावात साकारणार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:13 IST

प्लॅस्टीक बंदीवर देणार भर

जळगाव : पर्यावरणाचा समतोल हाच खरा शाश्वत विकास आहे, त्यासाठी अधिकाधिक वृक्षलागवड व्हावी, यासाठी आता प्रत्येक गावात वनराई साकारण्याची संकल्पना साकारणार आहोत़ यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन वर्षांपर्यंत वृक्षसंगोपनाचे वेतनही दिले जाईल, यासह प्रत्येक ग्रामपंचयातीने प्लास्टीक बंदीवर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यावरण विभागाचे तत्कालीन संचालक डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़ पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली़भौतिक विकास कितीही साधला तरी तरी पर्यावरणाची संसाधने, स्त्रोत यांचा समतोल जोपर्यंत राखला जात नाही तोपर्यंत हा भौतिक विकास हा शाश्वत नसेल़यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे़ शासनाच्या उपयायोजना आहेतच मात्र ही एक लोकचळवळ व्हावी, जंगल वाचविण्यासाठी लोकांनी जागृत होऊन चळवळ सुरू करावी, जंगल वाचले तर नदी, नाल्यांना बारमाही पाणी येईल, जलस्त्रोत आटणार नाही़ यासाठी लोकचळवळ महत्त्वाची आहे़ पाण्याचे शाश्वत साठे तयार होणे गरजेचे आहे़ त्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही़, असेही सीईओ डॉ़ पाटील यांनी सांगितले़सेंद्रीय शेतीकडे वळावेपिंकावर फवारण्यात येणाऱ्या किटकनाशकांच्या वापरात समतोल हवा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे़ पेस्टीस्टाईड मुळे जलप्रदुषण तर होते, भाजीपाल्यावरही परिणाम होतो, यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे़ जमिनही नापिक होते़ त्यामुळे सेंद्रीय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे़ अनेक राज्यांमध्ये पूर्णत: सेंद्रीय शेती केली जाते़ग्रामपंचायतींना सूचनाआपल्या गावात प्लॅस्टीक पिशव्या तसेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वीच सर्व ग्रामपंचातींना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ या व्यतिरिक्त गावात कमीत कमी ५० टक्के शोषखड्डे करावे, जेणेकरून भूजल पातळीत वाढ होईल, रेनवॉटर हार्व्हेस्टींगसाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासंदर्भातही ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे़ घनकचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्यासह अजैविक कचरा निर्माण होणाºया प्लास्टीकवर पूर्णत: बंदी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ यात लोकसहभागाला अधिक महत्त्व असल्याचे डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव