शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बहिणाबार्इंच्या काव्याचे मौल्यवान पैलू : रम्य कल्पनाविलास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:49 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.ए.बी.पाटील यांनी ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल सांगितलेले अनुभव.

निरक्षर बहिणाबार्इंच्या उत्कट काव्यात आचार्यांनी सांगितलेली काव्याची तत्त्वं दृष्टीस पडतात. उत्कट भाव व त्याबरोबरच विचार सौंदर्य आणि रम्य कल्पनाविलास हे त्यांच्या काव्याचे मौल्यवान पैलू आहेत. बहिणाबार्इंच्या काव्यात उत्कट भाव असे काही अभिव्यक्त झाले आहेत की, वाचणाऱ्याच्या हृदयात त्याच प्रकारच्या भावना उत्स्फूर्तपणे जागृत होतात.‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’सारख्या अप्रतिम काव्यपंक्ती तत्कालीन स्त्री जीवनाचे भावोत्कट कारुण्य प्रगट करतात. मोजक्या शब्दात एवढा मोठा आशय व्यक्त करणे भल्याभल्यांना जमत नाही. वाचक भारावून तर जातोच पण ह्या निरक्षर, अडाणी स्त्रीने तत्कालीन स्त्री जीवनाचा केवढा मोठा पट या पाच शब्दात मांडला आहे, ह्या विचाराने विस्मयचकितही होतो.बहिणाबार्इंची बुद्धी चौकस होती. रोजचे जीवन जगत असताना आस-पास घडत असलेले प्रसंग, घटना यांचे सूक्ष्म निरीक्षण ती करीत असावी. तिच्या मनावर ती घटना कोरली गेली की तिची सजग कल्पनाशक्ती त्या घटनेला शब्दबद्ध करून चित्रात्मक पद्धतीने प्रभावीरित्या अभिव्यक्त करत होती. मोटेचे पाणी तिच्या पुढील कुंड्यात (थायन्यात) धो-धो ओसंडतं. हे दृष्य पाहून बहिणाबाई ‘हुंदडतं पानी जसं तान्हं पायन्यात’ अशी सुंदर उपमा देऊन व्यक्त करतात. धरतीवरची हिरवळ उडत उडत आकाशात गेली व आकाशाचा रंग निळा झाला. अशा रम्य कल्पनांचा प्रयोग त्यांच्या काव्यात ठायी ठायी दिसतो. त्यांच्या काव्यात कल्पनेची भरारी आहे. पण त्याला वास्तवाची किनार आहे. हवेतल्या कोलांट उड्या नाहीत. वडाची हिरवी पानं व त्याला आलेली लालचुटूक फळं बघून वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आल्याची कल्पना बहिणाबाईच करू शकते. रोजच्या जगण्यातही असे अनेक प्रसंग येतात ज्यांना बहिणाबाई आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबद्ध करतात. चूल पेटत नाही, धूर करते आहे, गृहिणी बहिणाबाई वैतागते व म्हणते,‘पेट पेट धुक्कयेला किती घेशी माझा जीवअरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हीव।’विस्तवाला हीव येण्याची, थंडी वाजण्याची अफलातून कल्पना थक्क करणारी आहे. समाजात जगत असताना अवती भवती अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. बहिणाबाई तिच्या भाषेत माणसंही वाचत होती. स्वार्थी माणसांचे लबाड व खोटे व्यवहार तिला रूचत नसावेत. ती म्हणते,‘पाहिसन रे लोकांचे व्यवहार खोटे नाटेतव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे।’जगण्याशी व निसर्गाशी एकरूप असल्याशिवाय असे वर्णन शक्य नाही.सोपानदेवांनी एकदा बहिणाबाईला विचारले, ‘तू शेतात कष्टाची कामे करतेस, तुझी नजर जमिनीकडे आणि तुला हे सर्व विचार सुचतात तरी कसे?’ बहिणाबाईने उत्तर दिले, ‘धरतीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहते बाप्पा।’ (क्रमश:)