शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बहिणाबार्इंच्या काव्याचे मौल्यवान पैलू : रम्य कल्पनाविलास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:49 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.ए.बी.पाटील यांनी ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल सांगितलेले अनुभव.

निरक्षर बहिणाबार्इंच्या उत्कट काव्यात आचार्यांनी सांगितलेली काव्याची तत्त्वं दृष्टीस पडतात. उत्कट भाव व त्याबरोबरच विचार सौंदर्य आणि रम्य कल्पनाविलास हे त्यांच्या काव्याचे मौल्यवान पैलू आहेत. बहिणाबार्इंच्या काव्यात उत्कट भाव असे काही अभिव्यक्त झाले आहेत की, वाचणाऱ्याच्या हृदयात त्याच प्रकारच्या भावना उत्स्फूर्तपणे जागृत होतात.‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’सारख्या अप्रतिम काव्यपंक्ती तत्कालीन स्त्री जीवनाचे भावोत्कट कारुण्य प्रगट करतात. मोजक्या शब्दात एवढा मोठा आशय व्यक्त करणे भल्याभल्यांना जमत नाही. वाचक भारावून तर जातोच पण ह्या निरक्षर, अडाणी स्त्रीने तत्कालीन स्त्री जीवनाचा केवढा मोठा पट या पाच शब्दात मांडला आहे, ह्या विचाराने विस्मयचकितही होतो.बहिणाबार्इंची बुद्धी चौकस होती. रोजचे जीवन जगत असताना आस-पास घडत असलेले प्रसंग, घटना यांचे सूक्ष्म निरीक्षण ती करीत असावी. तिच्या मनावर ती घटना कोरली गेली की तिची सजग कल्पनाशक्ती त्या घटनेला शब्दबद्ध करून चित्रात्मक पद्धतीने प्रभावीरित्या अभिव्यक्त करत होती. मोटेचे पाणी तिच्या पुढील कुंड्यात (थायन्यात) धो-धो ओसंडतं. हे दृष्य पाहून बहिणाबाई ‘हुंदडतं पानी जसं तान्हं पायन्यात’ अशी सुंदर उपमा देऊन व्यक्त करतात. धरतीवरची हिरवळ उडत उडत आकाशात गेली व आकाशाचा रंग निळा झाला. अशा रम्य कल्पनांचा प्रयोग त्यांच्या काव्यात ठायी ठायी दिसतो. त्यांच्या काव्यात कल्पनेची भरारी आहे. पण त्याला वास्तवाची किनार आहे. हवेतल्या कोलांट उड्या नाहीत. वडाची हिरवी पानं व त्याला आलेली लालचुटूक फळं बघून वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आल्याची कल्पना बहिणाबाईच करू शकते. रोजच्या जगण्यातही असे अनेक प्रसंग येतात ज्यांना बहिणाबाई आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबद्ध करतात. चूल पेटत नाही, धूर करते आहे, गृहिणी बहिणाबाई वैतागते व म्हणते,‘पेट पेट धुक्कयेला किती घेशी माझा जीवअरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हीव।’विस्तवाला हीव येण्याची, थंडी वाजण्याची अफलातून कल्पना थक्क करणारी आहे. समाजात जगत असताना अवती भवती अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. बहिणाबाई तिच्या भाषेत माणसंही वाचत होती. स्वार्थी माणसांचे लबाड व खोटे व्यवहार तिला रूचत नसावेत. ती म्हणते,‘पाहिसन रे लोकांचे व्यवहार खोटे नाटेतव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे।’जगण्याशी व निसर्गाशी एकरूप असल्याशिवाय असे वर्णन शक्य नाही.सोपानदेवांनी एकदा बहिणाबाईला विचारले, ‘तू शेतात कष्टाची कामे करतेस, तुझी नजर जमिनीकडे आणि तुला हे सर्व विचार सुचतात तरी कसे?’ बहिणाबाईने उत्तर दिले, ‘धरतीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहते बाप्पा।’ (क्रमश:)