शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

राममंदिरासाठी २३ वर्षे पायात बूट-चप्पल न घालणारे वै.नारायण महाराज जुनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:57 IST

अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.

मुक्ताईनगर : अयोध्येत रामजन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणून अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेकांनी बलिदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासून श्रीराम मंदिर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत (२००८ ) म्हणजे २३ वर्षे पाळली.मूळचे तांदुळवाडी सिध्देश्वर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा येथील रहिवासी संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रती, विणेकरी वैकुंठवासी नारायण महाराज जुनारे अयोध्या आंदोलनात १९८६ पासून सहभागी झाले होते. तेव्हापासून २३ वर्षे २००८ पर्यंत पायात बूट, चप्पल अशी कोणतीही पादत्राणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात कधीच मरेपर्यंत घातली नाही. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शिलापूजन, कारसेवा आदी प्रत्येक लढ्यात उपक्रमात हिरीरीने सहभागी झाले. घराघरात लढा पोहचवला. विश्र्व हिंदू परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संत समिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांत आजीवन सदस्य ई. जबाबदारी सांभाळली होती. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राममंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून स्वतंत्र ओळख होती. श्रीरामपंत जोशी, राजेश जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृहकार्याचा गौरव अनेक वेळा करायचे. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत कारसेवेतसुध्दा अग्रेसर होते. कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशा लावल्या. त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांच्याकडे तीन महिने राहिले. आयुष्यभर आपल्या कीर्तन-प्रवचनात राममंदिर आंदोलन जनजागृती हा विषय असायचा. व्यासपीठ कुठले आहे कोणत्या पक्षाचे आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते. आपले रामजन्मभूमीविषयी विचार बेधडकपणे मांडायचे. नारायण महाराज यांची आई मुक्ताईवर विशेष निष्ठा होती. दरमहा वारीवर प्रल्हादराव पाटील यांची भेट व्हायची. भाऊ नेहमी म्हणत, बुवा किती दिवस अनवाणी फिरता घाला चप्पल त्या आजकाल चामड्याच्या नसतात पण? महाराज ठाम राहायचे.आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ किंवा खानदेशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा? राममंदिरवाले आहेत का? बूट घातला की नाही अजून? त्यांना म्हणा की बुट? घाला मोठेबाबांचा निरोप आहे परंतु गुरूंचीसुद्धा माफी मागत शेवटपर्यंत प्रतिज्ञा मोडली नाही. आयुष्याचे शेवटी शेवटी प.पू.भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होतांना पाहिले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या. आईसाहेब मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभूमी आंदोलनातील एक पणती होते. बुधवारी अयोध्येत राममंदिर भूमिपूजन झाले. या आनंदाच्या क्षणी महाराज आपल्यात नाहीत पण स्वर्गात नक्की आनंदात असतील, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर