शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने १३ मे पासून अनिश्चित काळासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने १३ मे पासून अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. सध्या जिल्ह्यातील लसींचादेखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी राखीव असलेला लसींचा साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरणदेखील बुधवारी जवळपास बंदच होते.

शहरातील रेडक्रॉसच्या केंद्रावर तर लसीकरण बंद असल्याचा बोर्डच लावण्यात आला होता. चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि स्वाध्याय भवन येथे फक्त दुसरा डोस घ्यायला येणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात होती. लसीकरणासाठी नवीन नोंदणीदेखील आता बंद करण्यात आली आहे.

महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १३ मे रोजी स्वाध्याय भवन येथे नियोजित १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेले लसीकरणाचे सत्र राज्य शासनाच्या सुचनेनुसार काही कारणास्तव रद्द करण्यात आले आहे. तरी ज्या नागरिकांचे १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाची नोंदणी झाली आहे त्यांनी लसीकरण पुन्हा सुरू होईल तेव्हा त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये.

नवीन १४५०० लसींचा साठा येणार

जिल्ह्यासाठी बुधवारी किंवा गुरुवारी १४, ५०० लसींचा नवा साठा येणार आहे. या लसी कोविशिल्ड असतील आणि त्या संपूर्ण दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या लसी त्यांनाच दिल्या जातील, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यामुळे सध्या तरी १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार नाही.

कोवॅक्सिनचा साठाच नाही

जिल्हा आरोग्य यंत्रणेला आता नव्याने जो लसींचा साठा येणार आहे, त्यात फक्त कोविशिल्डच आहे. त्या दुसऱ्या डोससाठी राखीव आहेत. त्यामुळे आता ज्यांना दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घ्यायचा आहे. त्यांची अडचण झाली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने कोव्हॅक्सिन उपलब्धच नाही. त्यामुळे दुसरा डोस नागरिकांना सध्या तरी मिळु शकणार नाही.

नागरिकांच्या लागल्या रांगा, तरीही निराशा

४५ वर्षांवरील नागरिक अनेक केंद्रांवर पहाटे पाच वाजतापासून रांगा लावून बसत आहेत. त्याचप्रमाणे चेतनदास मेहता रुग्णालयात अनेकांनी पहाटे तीन -चार वाजेपासून आपला क्रमांक लावून ठेवला होता. बुधवारी सकाळी तेथे जवळपास २०० च्या वर नागरिक कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश होता. त्यांनादेखील तेथून परत जावे लागले. तेथेदेखील लस उपलब्ध नसल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. ज्यादिवशी तेथे लस उपलब्ध असते त्यादिवशीदेखील हाच बोर्ड कायम असतो, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.