शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यापीठाचा निर्णय, विधी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना रिड्रेसलसाठी २५ पर्यंत मुदत

By अमित महाबळ | Updated: April 17, 2023 20:23 IST

विधि अभ्यासक्रमाच्या निकालात त्रुटी असल्याने उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

जळगाव : एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन विषयांच्या फेरतपासणीसाठी (रिड्रेसल) दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत मिळाली आहे. सोमवारी, विद्यापीठाने हा निर्णय घेतला.

विधि अभ्यासक्रमाच्या निकालात त्रुटी असल्याने उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने विधि महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक प्रतिनिधी यांच्या समवेत कुलगुरूंनी बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी एलएलबीच्या सहा आणि एलएलएमच्या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे रँडमली मूल्यांकन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला आढळून आला नाही. विद्यापीठ नियमानुसार उत्तरपत्रिकेत एकूण गुणांमध्ये १० टक्के बदल झाला तरच तो ग्राह्य धरला जातो.

विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजण्यासाठी सोमवारी, कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत विधि महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व अधिकार मंडळाचे काही सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत विद्यापीठाच्या अध्यादेशाप्रमाणे दोन विषयांसाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिड्रेसलला टाकण्याची संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दि. २५ एप्रिलपर्यंत रिड्रेसलची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या बैठकीत प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, प्राचार्य विजय बहीरम, प्राचार्य नितेश चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, ॲड. केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले, राहुल पाटील उपस्थित होते.