शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:23 IST

बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले.

ठळक मुद्देदोन दिवस पाहुणचारगोडधोड जेवणाने देणार गोड निरोप

चाळीसगाव : मजल दरमल करीत पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात येणा-या बाळूमामांच्या मेंढ्यांविषयी ग्रामीण भागात आपुलकीसह भक्तिभावदेखील पहावयास मिळतो. या मेंढ्या साधारण डिसेंबरच्या पूर्वाधात चरण्यासाठी दाखल होत असतात. तीन ते चार महिने त्यांचा गावोगावी मुक्काम असतो. गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले. ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचे वेशीवरच स्वागत केले. पाठीवर संसाराचे बि-हाड आणि सोबतीला मेंढ्यांचा तांडा. धनगर बांधवांचे जीवन असे भटकंतीवर असते. मजल दरमजल करीत या मेंढ्या राज्यभर चरण्यासाठी भ्रमंती करीत असतात. विशेषतः ग्रामीण भागात बाळूमामांच्या यामेंढ्याविषयी गावक-यांना ममत्व असते. यामुळेच मेंढ्या गावात आल्या की, त्यांचे वेशीवरच आबाल- वृद्धांसह स्वागत केले जाते.  सिद्धेश्वर आश्रमात मुक्काम आणि पाहुणचारगुरुवारी दुपारी दोन वाजता बेलदारवाडीत बाळू मामांच्या शिंगे असणा-या मेंढ्यांच्या सात वाड्यांचे आगमन झाले. दोन हजाराहून अधिक मेंढ्या आणि त्यांच्यासोबत असणारे २०० धनगर बांधव यांना येथील सिद्धेश्वर आश्रमात दोन दिवसीय मुक्कामात पाहुणाचार दिला जाणार आहे. आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील निवृत्तीनाथ महाराज तरुण मंडळाचा यात सक्रीय सहभाग आहे.मेंढ्यासाठी दिले बागायती कपाशीचे शेतसंभाजी केशरलाल कुमावत यांनी आपले दोन एकर बागायती कपाशीचे शेत बाळू मामांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी उपलब्ध करुन दिले. आपल्या शेताला बाळू मामांच्या मेंढ्यांचे पाय लागले. याचे मोठे समाधान असून म्हणूनच त्यांना चरण्यासाठी हिरव्यागार कपाशीचे शेत दिले. अशी आनंदी प्रतिक्रिया संभाजी कुमावत यांनी व्यक्त केली.आज एकादशीचे फराळ, शनिवारी गोड शिरागुरुवारी रात्री आठ वाजता सिद्धेश्वर आश्रमात आरती झाल्यानंतर  मेंढ्यांसोबत आलेल्या धनगर बांधवांना आमटी, भाकरी आणि भात असे जेवण दिले गेले. पंचक्रोशीतील पाचशेहून अधिक भाविकांचीही उपस्थिती होती.  आज शुक्रवारी एकादशी असल्याने साबुदाणा खिचडी, केळी तर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी दिली जाईल. शनिवारी बाळूमामांसह  मेंढ्यांनाही निरोप दिला जाणार असून आठशे भाविकांना देखील  वरण - भट्टी व गुळाचा गोड शिरा असा खान्देशी मेनू असणार आहे. अशी माहिती भाऊलाल कुमावत यांनी 'लोकमत'ला दिली. यशस्वीतेसाठी गोरख कुमावत, जितेंद्र कुमावत, प्रकाश कुमावत आदिंसह ग्रामस्थ मंडळी सहकार्य करीत आहे. 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारChalisgaonचाळीसगाव