शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण देशात मागासवर्गीय असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:18 IST

भीमराव यशवंत आंबेडकर : आरएसएसचाही सरकारवर प्रभाव

ठळक मुद्दे१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. महासभेच्या विचारपीठावरच १९५६ मध्ये धर्मांतराचे रणशिंग फुंकले गेले. देशभरात बौद्ध महासभेतर्फे राजकारणविरहीत मागासवगीर्यांची श्रामणेर शिबिरे, प्रबोधन मेळावे, परिषदा घेतल्या जातात. बौद्ध संस्कारीत पिढी घडविण्याचे काम महासभा करते.सद्य:स्थितीत धम्म परिषदा घेतल्या जात असून, हिंदी भाषिक राज्यांमध्ये याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर हे महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत.

जिजाबराव वाघ ।आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. २६ : केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत असले तरी, सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. चार वर्षात मागासवर्गीयांवर होणारे हल्ले वाढले असून, सरकारवर अप्रत्यक्षरित्या आरएसएसचा प्रभाव आहे. यामुळेच संपूर्ण देशात मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.चाळीसगाव येथे आयोजित बौद्ध महासभेतर्फे शनिवारी बौद्ध धम्म परिषद झाली. त्यासाठी ते येथे आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : दलित ऐक्य व्हावे असे तुम्हाला वाटते का?आंबेडकर : मागासवर्गीय नेतृत्वाने राजकीय पक्षात जाऊन विश्वासार्हता गमावली आहे. स्वयंघोषित नेतृत्व ऐक्याची भाषा करते. तथापि, त्याला जनाधार नाही. ऐक्य झाले नाही तरी काही बिघडणार नाही. प्रत्येकाने आपल्या पातळीवर हा लढा सुरू ठेवला पाहिजे.प्रश्न : आगामी निवडणुकांमध्ये ‘भारिप’ची भूमिका काय?आंबेडकर : आव्हान म्हणूनच अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक आम्ही लढवित आहोत. राज्यभरात भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. जातीयवादी शक्तींशी मुकाबला करण्यासाठी धर्मनिरपेक्ष आघाडीत सन्मानाने सामिल होऊ, अशी भूमिका स्वत: डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील जाहीर केली आहे.प्रश्न : सरकारवर आरएसएसचा प्रभाव आहे, असे वाटते का?आंबेडकर : भाजपाची मातृसंस्थाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. केंद्रच नव्हे तर राज्यातील सरकारवरही आरएसएसचा प्रभाव आहे. जातीय विचारसरणीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानावर विश्वास नाही. यामुळे लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आघात होत आहे. जातीय हिंसाचार आणि दंगली हे त्याचेच उदाहरण आहे. न्यायालय आणि नोकरशाहीची गळचेपी होत आहे. आरएसएसच्या प्रभावाची ही काही उदाहरणे आहेत.प्रश्न : निवडणुकांमध्ये बहुजन वर्गाची काय भूमिका असेल?आंबेडकर : देशभर दौरे सुरू आहेत. देशात केंद्र सरकारच्या विरोधात मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि बहुजन वर्गात असंतोष धुमसत आहे. समाजाच्या विविध घटकात सरकारविषयी संतापाची लाट आहे. गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत याचे पडसाद उमटले.प्रश्न : भीमा-कोरगाव दंगलीबद्दल काय सांगाल?आंबेडकर : ही दंगल सरकार पुरस्कृतच होती. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने सरकारचा दलितविरोधी चेहरा समोर आला. पुरावे देऊनही दंगल घडविणारे मोकाट आहेत. भारिप बहुजन महासंघाने याबाबत पोलीस यंत्रणेला खरबदारीच्या सूचनाही दिल्या होत्या.प्रश्न : व्यक्तिकेंद्री राजकारणाने न्यायसंस्थेला घेरले आहे का?आंबेडकर : देश आणि संविधानापेक्षाही आपण मोठे आहोत, असे सध्याच्या केंद्रीय नेतृत्वाचे वर्तन आहे. याचा फटका न्यायसंस्थेसह स्वायत्त संस्थांनाही बसत आहे. 

टॅग्स :Reliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनChalisgaonचाळीसगाव