शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, गॅस सिलिंडर कसे भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : गाजावाजा करून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना स्वयंपाकाचा मोफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. अनुदानही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

‘बजेट’ कोलमडतेय स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्पउत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. महागाईत गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८६५ रुपयांना मिळत असून, अनुदान बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

गॅस सिलिंडर दरात झालेली वाढ

जानेवारी २०१९ -६९२

जानेवारी २०२० - ७१४.५०

जानेवारी २०२१ - ६९९

ऑगस्ट २०२१ - ८६४.५०

अत्यल्प मिळते अनुदान

गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये अनुदान मिळत होते. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा होत आहे. या अनुदानासाठी ग्राहकांना बँकेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपॉझिट ठेवावी लागते. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे.

- उज्ज्वला पाटील, गृहिणी, भुसावळ

सिलिंडरचे भाव १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दुसरीकडे अनुदान मात्र नसल्यासारखेच झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे. तसेच अनुदान वाढविण्याची गरज आहे.

-कल्पना चौधरी, गृहिणी, भुसावळ

कोरोनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारे अनुदानही बंदच झाले आहे. त्यामुळे सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे.

- अश्विनी विनय परदेशी, गृहिणी, भुसावळ