शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सूक्ष्मसिंचनाद्वारे खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी

By admin | Updated: April 7, 2017 19:11 IST

दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे.

जळगाव : तापीकाठावरील चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल, जळगाव, अमळनेर भागात बागायती क्षेत्रात मेंढपाळ, काठेवाडी बांधव आपले पशुधन घेऊन दाखल झाले आहेत. अशात दोन ठिकाणी पशुधन विषारी पाणी प्यायल्याने दगावल्याच्या घटना घडल्या असून, सूक्ष्मसिंचनातून विद्राव्य खते देण्याचा प्रकार पशुधनाच्या जिवाशी आल्याचा निष्कर्ष प्रशासनाचा आहे.अजंदे ता.रावेर येथे मागील आठवडय़ात 190 मेंढय़ा शेतानजीक डबक्यातील पाणी प्यायल्याने दगावल्या होत्या. या मेंढय़ाचा मृत्यू युरीयायुक्त पाण्यानेच झाल्याचा अहवाल जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. नाशिक येथील प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातच अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथेही दुभत्या गायी दगावल्याचा प्रकार समोर आला असून, यासंदर्भातही शवविच्छेदन करून त्यासंबंधीचा अहवाल, नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने दिली. सूक्ष्मसिंचन (ड्रीप)द्वारे दिलेली खते पाण्याद्वारे डबक्याततापीकाठावर केळी बागा अधिक आहेत. शेतकरी मजूरटंचाईवर मात आणि तांत्रिक शेतीवर भर म्हणून आता थेट फर्टिलायझर टॅँक, व्हेंचुरीद्वारे विद्राव्य खते विरघळवून त्याचा सूक्ष्मसिंचन प्रणालीद्वारे (ड्रीप) केळीला पुरवठा करतात. अर्थातच संबंधित शेतातील पूर्ण जलवाहिनीत खतांचा अंश असतो. या जलवाहिनीतून, सूक्ष्मसिंचनाच्या नळ्य़ांमधून जे पाणी बाहेर पडते त्यातही या खतांचा अंश मोठय़ा प्रमाणात असतो. हे साचलेले पाणी कुठलीही व्यक्ती, पशुधन यांना पिण्यास अयोग्य व घातक आहे. अर्थात हेच पाणी प्यायल्याने अजंदे शिवारातील मेंढय़ा दगावल्या व मेंढपाळ बांधवांचे मोठे नुकसान  झाले. नैसर्गिक आपत्ती नसल्याने भरपाईचा प्रश्नपूर, वीज पडणे, वादळ, घर पडणे आदी घटनांमध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसानग्रस्त पशुधनमालकांना शासन भरपाई देते. जि.प.तर्फे तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला जातो, पण अजंदे किंवा अंतुर्ली येथील मेंढय़ा व गायी दगावल्याची घटना ही नैसर्गिक आपत्तीमध्ये नाही. त्यामुळे संबंधित घटनांमध्ये भरपाईचा कुठलाही प्रस्ताव नाही. फक्त पालकमंत्री, मंत्री स्तरावर या घटनांबाबत भरपाईचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनातर्फे मिळाली. मेंढपाळ, काठेवाडी बांधव मोठय़ा संख्येने तापीकाठ व इतर भागात आपल्या पशुधनासाठी आले आहेत. त्यांनी पशुधनाला पाणी पाजण्यासाठी नेताना  डबक्यातील पाणी पाजू नये. साचलेले डबके केळीच्या शेतातील ड्रीप, जलवाहनीमुळे निर्माण झाले का, हे पाहावे. -डॉ.पी.एस.इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.