शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावात महामार्गावर अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत पुन्हा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:39 IST

भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.

ठळक मुद्देआठवडाभरातील दुसरी घटना दोन जण जखमीलग्नाला येत होते दुचाकीने

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,४: भरधाव ट्रकने सहायक फौजदाराला चिरडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी साडे सहा वाजता पुन्हा अजिंठा चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ट्रकचा मागून धक्का लागल्याने दुचाकीवर मागे बसलेले सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी (वय ४० रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश) कोसळले व त्यात ट्रकचे टायर डोक्यावरुन गेल्याने ते जागीच गतप्राण झाले. या व्यतिरिक्त दोन जण किरकोळ जखमी झाले.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सत्ती श्रीनिवास सत्यनारायण रेड्डी, अनिल संजय सय्या एटाकल्ली (वय ३२) व आदी सुरय्या रेड्डी (वय ३५) तिन्ही रा.श्रीनगर, भुसावळ मुळ रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश हे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एम.१२९३) सोमवारी सकाळी लग्नासाठी जळगावात येत होते. अजिंठा चौकात नेरी नाक्याकडे वळण घेत असताना भुसावळकडूनच मागून आलेल्या ट्रकचा (क्र.जी.जे.०३ बी.टी.९३३५) दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे मागे बसलेला सत्ती हा खाली पडला व त्याचवेळी ट्रकचे टायर त्याच्या डोक्यावरुन गेले. या घटनेत सत्तीचा जागीच मृत्यू झाला. आदी हा दुचाकी चालवत होता तर अनिल मध्ये बसलेला होता. यात दोघंही किरकोळ जखमी झाले.