शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचौपदरीकरण कामावरील दोन तरुण सुरक्षारक्षकांना चिरडलेरात्री झोपलेले असताना वाहन गेले डोक्यावरूनडोक्याचा झाला अक्षरश: चेंदामेंदामयत दोघे चुलत आत्येभाऊ होतेघटनास्थळाजवळच असलेल्या या तरुणांच्या मोटारसायकलचेही नुकसानसकाळी घटना उघडकीस आली तेव्हा घटनास्थळी झाली प्रचंड गर्दी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेतकंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दोघा युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे, तर दोन तरुणांच्या अपघाती निधनाने शहर हळहळले आहे.पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत तर दोघे चुलत आत्ये भाऊ आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरिटीपूर्वी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक ७० येथे डिव्हायडर मशीन येथे होती. ते झोपले असताना मध्यरात्री ते पहाटे दरम्यान अज्ञात वाहन दोघ तरुणांच्या डोक्यावर वरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा व चेहºयाचा अक्षरश: चेंदामेंदा केला आणि ते जागीच गतप्राण झाले होते. जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.कंपनीच्या वाहनाने चिरडल्याचा संशयदरम्यान, ही घटना खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. याठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नव्हते. तसेच या ठिकाणी रस्त्याचे काम करणाºया वाहनांची रात्री वर्दळ असते. त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीतरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही. घटनास्थळाकडे वाहतूक करणारी वाहने जाण्याचा अधिकतर संबंध येत नाही. या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करतात. त्यामुळे कंपनीच्या वाहनांवर संशय आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असून, उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा जमाव थांबून आहे.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर