शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचौपदरीकरण कामावरील दोन तरुण सुरक्षारक्षकांना चिरडलेरात्री झोपलेले असताना वाहन गेले डोक्यावरूनडोक्याचा झाला अक्षरश: चेंदामेंदामयत दोघे चुलत आत्येभाऊ होतेघटनास्थळाजवळच असलेल्या या तरुणांच्या मोटारसायकलचेही नुकसानसकाळी घटना उघडकीस आली तेव्हा घटनास्थळी झाली प्रचंड गर्दी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेतकंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दोघा युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे, तर दोन तरुणांच्या अपघाती निधनाने शहर हळहळले आहे.पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत तर दोघे चुलत आत्ये भाऊ आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरिटीपूर्वी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक ७० येथे डिव्हायडर मशीन येथे होती. ते झोपले असताना मध्यरात्री ते पहाटे दरम्यान अज्ञात वाहन दोघ तरुणांच्या डोक्यावर वरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा व चेहºयाचा अक्षरश: चेंदामेंदा केला आणि ते जागीच गतप्राण झाले होते. जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.कंपनीच्या वाहनाने चिरडल्याचा संशयदरम्यान, ही घटना खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. याठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नव्हते. तसेच या ठिकाणी रस्त्याचे काम करणाºया वाहनांची रात्री वर्दळ असते. त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीतरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही. घटनास्थळाकडे वाहतूक करणारी वाहने जाण्याचा अधिकतर संबंध येत नाही. या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करतात. त्यामुळे कंपनीच्या वाहनांवर संशय आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असून, उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा जमाव थांबून आहे.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर