शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मुक्ताईनगरात महामार्गावर आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचौपदरीकरण कामावरील दोन तरुण सुरक्षारक्षकांना चिरडलेरात्री झोपलेले असताना वाहन गेले डोक्यावरूनडोक्याचा झाला अक्षरश: चेंदामेंदामयत दोघे चुलत आत्येभाऊ होतेघटनास्थळाजवळच असलेल्या या तरुणांच्या मोटारसायकलचेही नुकसानसकाळी घटना उघडकीस आली तेव्हा घटनास्थळी झाली प्रचंड गर्दी

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अपघातांची मालिका सुरू असताना बुधवारी पहाटे चक्क रस्त्याच्या कामावरील दोन तरुण सुरक्षा रक्षकांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेतकंपनीने सुरक्षा व्यवस्थेकडे डोळेझाक केल्याने तरुणांना जीव गमवावे लागल्याचा आक्षेप घेत नातेवाईकांनी अज्ञात वाहचालकासह चौपदरीकरण करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. दोघा युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जोपर्यंत संबंधी कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे, तर दोन तरुणांच्या अपघाती निधनाने शहर हळहळले आहे.पवन संजय जयकर (वय १८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (वय १८) (दोन्ही राहणार मुक्ताईनगर) अशी मयतांची नाव आहेत तर दोघे चुलत आत्ये भाऊ आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून ते ब्ल्यू स्टार सेक्युरिटीपूर्वी मॅनेजमेंट या कंपनीत सुरक्षगार्ड म्हणून काम करीत होते. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी चौपदरीकरण महामार्गावर पॉईंट क्रमांक ७० येथे डिव्हायडर मशीन येथे होती. ते झोपले असताना मध्यरात्री ते पहाटे दरम्यान अज्ञात वाहन दोघ तरुणांच्या डोक्यावर वरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा व चेहºयाचा अक्षरश: चेंदामेंदा केला आणि ते जागीच गतप्राण झाले होते. जवळच उभ्या असलेल्या या तरुणांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. सकाळी घटना उघडकीस आल्याने घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.कंपनीच्या वाहनाने चिरडल्याचा संशयदरम्यान, ही घटना खडसे फार्म हाऊसजवळील पुलावर घडली. याठिकाणी कोणतेही वळण रस्त्याचे फलक नव्हते. तसेच या ठिकाणी रस्त्याचे काम करणाºया वाहनांची रात्री वर्दळ असते. त्यामुळे कंपनीच्याच डंपरने हा अपघात घडला असावा, असा संशय मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. कंपनीच्या अज्ञात वाहनासह अज्ञात चालक आणि कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.तोपर्यंत शव ताब्यात घेणार नाहीतरुणांची ड्युटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नाही. घटनास्थळाकडे वाहतूक करणारी वाहने जाण्याचा अधिकतर संबंध येत नाही. या भागात फक्त रस्त्यावर काम करणारी अवजड वाहने रहदारी करतात. त्यामुळे कंपनीच्या वाहनांवर संशय आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीचे अधिकारी रुग्णालयात येत नाही तोपर्यंत तरुणांचे शव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकानी घेतली असून, उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा जमाव थांबून आहे.

टॅग्स :AccidentअपघातMuktainagarमुक्ताईनगर