शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जळगाव जिल्ह्यातील २ लाखावर शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 11:34 IST

३ लाख ८९ हजार हेक्टरवर बोंडअळीमुळे नुकसान : सरसकट मिळणार नुकसान भरपाई

ठळक मुद्देआतापर्यंत ८९ हजार शेतकऱ्यांनी केली तक्रारबोंडअळीच्या नुकसानीत दोन प्रकारसरसकट मिळणार नुकसान भरपाई

सुशील देवकरजळगाव,दि.९ : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ३९४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८९ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागातर्फे राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडून मदतीची मागणी करावयाची असल्याने तातडीने ही आकडेवारी पाठविण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान, कपाशी उपटून फेकलेल्या शेतकऱ्यांनाही सातबारावरील नोंदी गृहीत धरून व शपथपत्र घेऊन नुकसान भरपाईचा लाभ दिला जाणार आहे. शासन सरसकट नुकसान भरपाईची घोषणा नागपूर अधिवेशनात करण्याची शक्यता आहे.नुकसानीत दोन प्रकारपुणे येथे कृषी आयुक्तांकडे गुरुवारी राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले असे शेतकरी व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी असे दोन प्रकार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील कापसाच्या १०० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसाच्या एकूण ४ लाख ७५ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८९ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाला दिला आहे. त्यातही २ हेक्टरच्या आतील क्षेत्र असलेले शेतकरी व २ हेक्टरच्या वर क्षेत्र असलेले शेतकरी असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. त्यात २ हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्यांमध्ये १ लाख ५२ हजार ६१३ शेतकरी असून, त्यांचे क्षेत्र १ लाख ६४ हजार १४९ हेक्टर आहे. तर २ हेक्टरच्यावर क्षेत्र असलेल्या शेतकºयांची संख्या ६२ हजार ७८१ हेक्टर आहे. त्यांचे एकूण क्षेत्र २ लाख २४ हजार ९१९ हेक्टर आहे.आतापर्यंत ८९ हजार शेतकऱ्यांनी केली तक्रारखराब बियाण्यामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याबाबत जी फॉर्ममध्ये ८९ हजार ७०३ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या ६९ हजार ६५ हेक्टर क्षेत्रापैकी १७६७ शेतकऱ्यांच्या १४०७ हेक्टर क्षेत्रावर पंचनामा झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावcottonकापूस