शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

४० टक्के बांधकामाच्या सक्तीने १४०० उद्योगांना बसणार भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:54 IST

मंदीतील लघु उद्योगांवर नवीन संकट

जळगाव : उद्योगासाठी असलेल्या एकूण जागेपैकी ४० टक्के जागेवर बांधकाम करण्याची सक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केल्याने त्याचा मोठा फटका लघू व मध्यम उद्योजकांना बसणार असून या निर्णयामुळे जळगावातील एक हजार ४०० उद्योगांना भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, या संदर्भात उद्योजकांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली असून या बाबत फेर विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे याकडे आता या उद्योजकांचे लक्ष लागलेले आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या एकूण जागेच्या ४० टक्के बांधकाम करण्याची सक्ती केली आहे. पूर्वी यासाठी २० टक्के बांधकाम करणे गरजे होते. मात्र आता या नवीन निर्णयानुसार बांधकाम थेट दुप्पट करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील लघु व मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याने त्याला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे.अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी पडूनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी तशाच पडून आहे.त्याकडे दुर्लक्ष करीत लघु व मध्यम उद्योगांना असे वेठीस धरणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. पडून असलेल्या त्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार करावा व सध्याच्या उद्योजकांना हा नवीन निर्णय अडचणीचा ठरणार असल्याने हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, या निर्णयाला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध करीत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली व हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्या वेळी या निर्णयास स्थगिती देऊ व पुढील सुधारीत निर्णय घेताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले असल्याची माहिती जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनचे सचिव सचिन चोरडिया यांनी दिली.मागण्यांकडे दुर्लक्ष, उद्योगांपुढे नवीन संकटशेतीनंतर अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेले लघु उद्योग क्षेत्र सध्या विविध अडचणीतून जात आहे. वीज दर वाढीने हे उद्योजक चिंतीत असून वीज बिल माफीसह व्याजदरात सवलत देणे, विशेष योजनेंतर्गत सवलती देणे अशा मागण्या लघु उद्योजकांच्या असून त्यासाठी पाठपुरावा केला तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे व दुसरीकडे आता वाढीव बांधकामाच्या संकटाने चिंता असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.जळगावात अधिक फटकाजळगावातील अगोदरच उद्योगांची बिकट स्थिती असून डाळ उद्योग, प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून कसेबसे औद्योगिक क्षेत्र सुरू आहे. त्यात येथे लघु उद्योगांची संख्या अधिक म्हणजेज जवळपास एक हजार ४०० असून एमआयडीच्या या निर्णयाने जळगावात मोठा फटका बसणार आहे.नवीन गुंतवणूक करणे अशक्यराज्यातील छोट्या व मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना सुद्धा या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून उद्योगांची सध्याची परिस्थिती पाहता नवीन गुंतवणूक करणे उद्योगाला शक्य नाही. तसेच ज्या जमिनीवर कोणताही उद्योग उभारला गेला नाही अशा जमिनी शासनाने परत घ्यावेत, ज्या ठिकाणी लहान अथवा मोठ्या स्वरूपात उद्योग प्रत्यक्षात कार्यरत आहेत, अशा उद्योगांना हा नियम लावणे अयोग्य असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.उद्योगाच्या एकूण जागेपैकी ४० टक्के बांधकामासंदर्भातील एमआयडीसीच्या निर्णयामुळे जळगावातील जवळपास एक हजार ४०० उद्योगांना झळ बसणार आहे. आधीच उद्योगांची बिकट स्थिती असल्याने हे नवीन संकट ओढावले आहे. या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार झाला पाहिजे. सध्याच्या उद्योजकांना एमआयडीसीचा हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :Jalgaonजळगाव