शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

४० टक्के बांधकामाच्या सक्तीने १४०० उद्योगांना बसणार भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:54 IST

मंदीतील लघु उद्योगांवर नवीन संकट

जळगाव : उद्योगासाठी असलेल्या एकूण जागेपैकी ४० टक्के जागेवर बांधकाम करण्याची सक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केल्याने त्याचा मोठा फटका लघू व मध्यम उद्योजकांना बसणार असून या निर्णयामुळे जळगावातील एक हजार ४०० उद्योगांना भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, या संदर्भात उद्योजकांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली असून या बाबत फेर विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे याकडे आता या उद्योजकांचे लक्ष लागलेले आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या एकूण जागेच्या ४० टक्के बांधकाम करण्याची सक्ती केली आहे. पूर्वी यासाठी २० टक्के बांधकाम करणे गरजे होते. मात्र आता या नवीन निर्णयानुसार बांधकाम थेट दुप्पट करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील लघु व मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याने त्याला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे.अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी पडूनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी तशाच पडून आहे.त्याकडे दुर्लक्ष करीत लघु व मध्यम उद्योगांना असे वेठीस धरणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. पडून असलेल्या त्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार करावा व सध्याच्या उद्योजकांना हा नवीन निर्णय अडचणीचा ठरणार असल्याने हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, या निर्णयाला राज्यातील सर्व उद्योजकांनी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या माध्यमातून विरोध करीत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली व हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्या वेळी या निर्णयास स्थगिती देऊ व पुढील सुधारीत निर्णय घेताना उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले असल्याची माहिती जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनचे सचिव सचिन चोरडिया यांनी दिली.मागण्यांकडे दुर्लक्ष, उद्योगांपुढे नवीन संकटशेतीनंतर अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेले लघु उद्योग क्षेत्र सध्या विविध अडचणीतून जात आहे. वीज दर वाढीने हे उद्योजक चिंतीत असून वीज बिल माफीसह व्याजदरात सवलत देणे, विशेष योजनेंतर्गत सवलती देणे अशा मागण्या लघु उद्योजकांच्या असून त्यासाठी पाठपुरावा केला तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे व दुसरीकडे आता वाढीव बांधकामाच्या संकटाने चिंता असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.जळगावात अधिक फटकाजळगावातील अगोदरच उद्योगांची बिकट स्थिती असून डाळ उद्योग, प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून कसेबसे औद्योगिक क्षेत्र सुरू आहे. त्यात येथे लघु उद्योगांची संख्या अधिक म्हणजेज जवळपास एक हजार ४०० असून एमआयडीच्या या निर्णयाने जळगावात मोठा फटका बसणार आहे.नवीन गुंतवणूक करणे अशक्यराज्यातील छोट्या व मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना सुद्धा या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून उद्योगांची सध्याची परिस्थिती पाहता नवीन गुंतवणूक करणे उद्योगाला शक्य नाही. तसेच ज्या जमिनीवर कोणताही उद्योग उभारला गेला नाही अशा जमिनी शासनाने परत घ्यावेत, ज्या ठिकाणी लहान अथवा मोठ्या स्वरूपात उद्योग प्रत्यक्षात कार्यरत आहेत, अशा उद्योगांना हा नियम लावणे अयोग्य असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.उद्योगाच्या एकूण जागेपैकी ४० टक्के बांधकामासंदर्भातील एमआयडीसीच्या निर्णयामुळे जळगावातील जवळपास एक हजार ४०० उद्योगांना झळ बसणार आहे. आधीच उद्योगांची बिकट स्थिती असल्याने हे नवीन संकट ओढावले आहे. या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- सचिन चोरडिया, सचिव, जळगाव इंडस्ट्रीज् असोसिएशनएसईझेड अथवा अन्य प्रकल्पांना दिलेल्या जमिनी जर वापरात येत नसतील तर त्या जमिनी बाबत प्राधान्याने विचार झाला पाहिजे. सध्याच्या उद्योजकांना एमआयडीसीचा हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :Jalgaonजळगाव