शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

५ पट दंड रद्दबाबत भाजपा नगरसेवकांमध्ये दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:06 AM

तीनवेळा झाला नाही निर्णय

ठळक मुद्दे न्यायालयाची भिती

जळगाव : मनपाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने थकीत भाड्यापोटी लावलेल्या पाचपट दंड रद्द करण्यासाठी पुढील महासभेत ठराव आणण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांचा आहेत. मात्र, दंड रद्द करण्याचा ठरावावरून भाजपा नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. न्यायालयाचा अवमान होईल, या भितीमुळे नगरसेवक हा ठराव करण्यास नकार देत असल्याची माहिती भाजपाच्या नगरसेवकांनीच नाव न सांगण्याचा अटीवर ‘लोकमत’ ला दिली आहे.त्यामुळे आमदार सुरेश भोळेंकडून दंड रद्द करण्याबाबत कितीही दावे केले असले तरी या महासभेतही दंड रद्द करण्यचा ठराव होणे कठीण दिसत आहे. मनपाच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांवर मनपाने सहा वर्षाच्या थकीत भाड्यापोटी एक वर्षासाठी पाच पट दंड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मनपाचा हा निर्णय गाळेधारकांवर अन्याय करणारा निर्णय असून, पाच पट दंड रद्द करण्याची मागणी गाळेधारकांकडून केली जात आहे. त्यानुसार भाजपाने मनपाची सत्ता हाती घेतल्यानंतर हा दंड रद्द करण्याचे आश्वासन भाजपाने गाळेधारकांना दिले होते.मात्र, सहा महिने होवून देखील सत्ताधाºयांनी गाळेधारकांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. न्यायालयाचा अवमान होण्याच्या भीतीने तीन वेळा बैठका होऊनही यावर निर्णय होऊ शकलेला नाही.प्रत्येक महासभेपूर्वी करण्यात आली घोषणा, प्रत्यक्षात मात्र घूमजावसत्ताधारी भाजपाने सत्तेची सुत्रे हाती घेतल्यापासून झालेल्या सर्व महासभांपूर्वी गाळेधारकांवरील पाच पट दंड रद्द करण्याचा ठराव करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष महासभेच्यावेळेस हा प्रस्ताव विषयपत्रिकेत देखील ठेवला जात नाही. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी होणाºया महासभेत हा निर्णय होईल का ? याबाबत शंका उपस्थित होत आहे. ७ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत दंड रद्द करण्याबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महिनाभरातच समितीचा ठराव मनपाने विखंडनासाठी पाठवून दिला. त्यामुळे हा विषय देखील मार्गी लागलेला नाही.नगरसेवकांची होणार बैठकपाच पट दंड रद्द करण्यासाठी होणाºया महासभेपूर्वी सर्व नगरसेवकांची बैठक होणार असून, या बैठकीत काही कायदेतज्ज्ञांकडून देखील ठरावाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कारण हा निर्णय घेतला तर न्यायालयाने दिलेल्या गाळे जप्तीबाबतच्या आदेशाबाबत न्यायालयाचा अवमान होईल,अशी भिती नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे काही कायदेतज्ज्ञांकडून नगरसेवकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याआधी सर्व नगरसेवकांची बैठक घेवून ५ पट दंड रद्द करण्याचा निर्णय बहुमताने घेण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही हा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे आता नगरसेवक धजावतील का ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.