शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जळगावात मोडलेले दोन संसार समुपदेशनामुळे पुन्हा बहरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:18 IST

दोन्ही कुटुंबांच्या आयुष्याला नव्याने झाली सुरुवात

ठळक मुद्देदोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नोंदण्याचा निर्णयएक कुटुंबाचा तर समाजाच्या पंचमंडळामार्फत झाला होता घटस्फोटदोन्ही कुटुंबात किरकोळ कारणांवरून मतभेद

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : किरकोळ कारणावरुन दुरावलेल्या दोन कुटुंबातील पती-पत्नीला सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेऊन एकत्र आणून त्यांचा संसार पुन्हा बहरला आहे. यातील एक कुटुंबाचा तर पंच घटस्फोट झाला होता तर दुसºया एका दाम्पत्याला एक गोंडस बाळही होते. त्यामुळे या दोघा कुटुंबांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील संतोष खैरनार यांच्याशी जळगावातील संध्या यांचे लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू असताना दीड वर्षानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. अशातच संध्या यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला त्यामुळे ते विभक्त राहायला लागले. पत्नी संध्या यांनी समाजसेविका मंगला बारी यांच्याकडे संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बारी यांनी जळगावात गोलाणी मार्केट येथे बोलवून त्याची समजूत घातली. दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर केले. दोघांनीही सकारात्मकता दर्शविल्यानंतर त्यांचा मोडलेला संसार पुन्हा जोडला गेला आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नोंदण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा बारी यांनी गुलाबपुष्प देऊन गौरव केला.

पंच फारकत झाले जोडपे एकत्र...

प्रल्हाद बद्रीनाथ बारी व सरला बारी या दाम्पत्याचादेखील बारी यांनी समेट घडवून आणला.दहा वर्षांपूर्वी प्रल्हाद बारी यांचा सरला यांच्याशी विवाह झाला होता. कामासाठी दोघं पिंप्राळा येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते.दोघांमध्ये कौटुंबिक कलहातून मोठा वाद झाला. त्यातून दोघांची पंचफारकती झाली होती. पंच फारकती झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही विभक्त झाले होते. मंगला बारी यांनी या कुटुंबातील सदस्यांची समजूत घातली. दोन दिवसापूर्वीच हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आले आहे. दरम्यान, मंगला बारी यांनी आतापर्यंत २५१ दाम्पत्यांचा संसार पुन्हा जोडलेला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव