शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

प्रताप महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्रास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 19:57 IST

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देवाणिज्य व व्यवस्थापनातील संधी आणि आव्हाने यावर होतोय उहापोह वाणिज्य व व व्यवस्थापन प्रशाळेमार्फत विविध उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. त्यात वाणिज्य आणि व्यवस्थापनातील संधी आणि आव्हाने यावर तज्ज्ञ तथा संशोधकांनी महत्वपूर्ण उहापोह केला.महाविद्यालयाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वाणिज्य व व व्यवस्थापन प्रशाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे राष्ट्रस्तरीय चर्चासत्र त्याचाच एक भाग आहे. देशभरातून १५० प्रतिनिधींनी नावे नोंदवली आहेत. त्यात मुख्य विषयाशी संबंधित जवळपास शंभर विषयांवर विचारमंथन सुरू झाले आहे. उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी होते. परिषदेसाठी संसाधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते.चर्चासत्राचे सचिव उपप्राचार्य एस.ओ.माळी व विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांनी प्रास्ताविक केले. संचालक नीरज अग्रवाल यांनी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राज्य वाणिज्य परिषदेचे सचिव प्रा.डॉ.जी.वाय. शितोळे, प्रा.आर.आर.बहुगुणे व प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी प्रतापियन तथा मुंबई विद्यापीठाचे डीन डॉ.अजय भामरे, प्राचार्य लक्ष्मण कारांगळे, प्राचार्य अजय पेठे, प्रा.डॉ.पूनम कक्कड, प्रा.डॉ.विनोद गावंडे यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना सन्मानित आले.'इ जर्नल' व 'आम्ही प्रतापियन'चे आमदार पाटील यांनी विमोचन केले.प्रा.डॉ.तुंटे व प्रा.कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.पी.टी. चौधरी यांनी आभार मानले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम,उपाध्यक्ष कमल कोचर व माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कायोर्पाध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, संचालक डॉ.बी. एस. पाटील, जितेंद्र जैन, हरी भिका वाणी, चिटणीस प्रा.डॉ.अरुण कोचर, प्राध्यापक प्रतिनिधी पी.आर.भुतडा, शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले व परिषदेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी प्रा. किशोर जगदेव, प्रा. डॉ. योगेश तोरवणे, प्रा.किरण सूर्यवंशी, प्रा.किरण भागवत, प्रा.ज्ञानेश्वर मराठे, प्रा.अनिल शेळके आदी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयAmalnerअमळनेर