शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अडीचपट रुग्णवाढीसोबत निर्बंधांचा कालावधीही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमी न होता ती उलट अडीचपटीने वाढल्याने निर्बंधांचाही कालावधी वाढविण्यात आला आहे. अजूनही गर्दीचे प्रमाण कमी होत नसल्याने कडक निर्बंधाकडे वाटचाल होण्याचीही शक्यता आहे. वाढविण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दरम्यान असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा एकदा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवार, ६ मार्च रोजी दिले. दरम्यान, १५ मार्चपर्यंत निर्बध कायम असल्याने ११ मार्च रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीवरही कोरोनाचे सावट राहणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांना वेग देत कारवाईचे सत्र सुरू केले होते. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात अनेक निर्बंध लावण्यात आले.

निर्बंधानंतरही वाढली रुग्णसंख्या

कोरोनाची साखळी खंडित होऊन संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले खरे. मात्र निर्बंध घालण्यात आलेले शाळा, महाविद्यालय इतर ठिकाणी प्रवेश अथवा संचार नसला तरी बाजारपेठ, बसस्थानक अशा अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी कमी होत नसून अनेक जण मास्कचा वापर न करणे व इतरही नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याचे चित्र आहे. २२ मार्च निर्बंध घातले त्यादिवशी जिल्ह्यात ३१९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन ४००, ५०० च्या पुढे गेली व ५ मार्च रोजी तर थेट ७७२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधांचा कालावधीही वाढणार असल्याचे मानले जात होते. त्यानुसार अखेर १५ मार्चपर्यंत निर्बंध कायम ठे‌वण्यात आले आहे.

आकडे दाखवितात गांभीर्य व निर्बंध मर्यादावाढीचे कारण

दिनांक जिल्ह्यातील रुग्णसंख्या

२२ फेब्रुवारी ३१९

२३ फेब्रुवारी ३६८

२८ फेब्रुवारी ४०८

२ मार्च ४९२

४ मार्च ५४८

५ मार्च ७७२

दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर वर्ग सुरू करण्याविषयी नवे आदेश

इयत्ता दहावी, बारावी व महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सदर वर्ग सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील रुग्णसंख्या विचारात घेऊन त्या-त्या वेळेस नव्याने आदेश देण्यात येतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.