शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

अडीचपट रुग्णवाढीसोबत निर्बंधांचा कालावधीही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमी न होता ती उलट अडीचपटीने वाढल्याने निर्बंधांचाही कालावधी वाढविण्यात आला आहे. अजूनही गर्दीचे प्रमाण कमी होत नसल्याने कडक निर्बंधाकडे वाटचाल होण्याचीही शक्यता आहे. वाढविण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दरम्यान असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा एकदा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवार, ६ मार्च रोजी दिले. दरम्यान, १५ मार्चपर्यंत निर्बध कायम असल्याने ११ मार्च रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीवरही कोरोनाचे सावट राहणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांना वेग देत कारवाईचे सत्र सुरू केले होते. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात अनेक निर्बंध लावण्यात आले.

निर्बंधानंतरही वाढली रुग्णसंख्या

कोरोनाची साखळी खंडित होऊन संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले खरे. मात्र निर्बंध घालण्यात आलेले शाळा, महाविद्यालय इतर ठिकाणी प्रवेश अथवा संचार नसला तरी बाजारपेठ, बसस्थानक अशा अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी कमी होत नसून अनेक जण मास्कचा वापर न करणे व इतरही नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याचे चित्र आहे. २२ मार्च निर्बंध घातले त्यादिवशी जिल्ह्यात ३१९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन ४००, ५०० च्या पुढे गेली व ५ मार्च रोजी तर थेट ७७२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधांचा कालावधीही वाढणार असल्याचे मानले जात होते. त्यानुसार अखेर १५ मार्चपर्यंत निर्बंध कायम ठे‌वण्यात आले आहे.

आकडे दाखवितात गांभीर्य व निर्बंध मर्यादावाढीचे कारण

दिनांक जिल्ह्यातील रुग्णसंख्या

२२ फेब्रुवारी ३१९

२३ फेब्रुवारी ३६८

२८ फेब्रुवारी ४०८

२ मार्च ४९२

४ मार्च ५४८

५ मार्च ७७२

दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर वर्ग सुरू करण्याविषयी नवे आदेश

इयत्ता दहावी, बारावी व महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सदर वर्ग सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील रुग्णसंख्या विचारात घेऊन त्या-त्या वेळेस नव्याने आदेश देण्यात येतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.