शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

‘श्रीं’ना अडीच कोटींचे श्रीफळ अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:07 IST

गणेशोत्सवासाठी १२ लाख नारळांची विक्री

जळगाव : गणेशोत्सवासाठी नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढून यंदा या उत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावातून तब्बल ३५ ट्रक नारळांची विक्री होऊन यातून अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान, या वर्षी आवक चांगली असली तरी भाव वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कोणताही धार्मिक विधी तसेच सण-उत्सवासाठी नारळ अर्थात श्रीफळाला अनन्य महत्त्व असते. त्यात लाडक्या बाप्पाच्या स्थापनेत श्रीफळ कलश आवर्जूून असतोच. सोबतच अनेक मंडळ श्रीफळापासून गणराय साकारत असतात. गणेशोत्सव घरोघरी साजरा होण्यासह सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी असते. त्यामुळे घरगुती गणरायासाठी तसेच मंडळांकडूनही नारळाला मोठी मागणी वाढते. त्यानुसार यंदा तर या मागणीमध्ये वाढ झाली आहे.३५ ट्रक नारळदक्षिण भारतातून आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यामधून जळगावात नारळाची आवक होते. गणेशोत्सवाचा काळ लक्षात घेता जळगावातील व्यापाऱ्यांनी नारळांची आगाऊ नोंदणी केली होती. त्यानुसार मागणीनुसार यंदा नारळाचा पुरवठा झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिवसेंदिवस मंडळांची संख्या वाढती असल्याने त्याचा अंदाज घेत व्यापाऱ्यांनी यंदा जादाच मागणी नोंदविली होती. त्यानुसार गणेशोत्सवासाठी जळगावात तब्बल ३५ ट्रक नारळाची आवक झाली. १२० नारळांची एक गोणी असते व एका ट्रकमध्ये २८० गोण्या बसतात. ३५ ट्रक नारळ विक्रीची आकडेवारी पाहिली तर ११ लाख ७६ हजार नारळांची अर्थात जवळपास १२ लाख नारळांची खरेदी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी केली. या सर्वांची उलाढाल पाहिली तर ती अडीच कोटीच्या जवळपास जाते.निम्म्याहून अधिक मागणी शहरातदक्षिण भारतातून आलेल्या नारळांच्या ३५ ट्रकपैकी २० ट्रक नारळांची केवळ जळगाव शहरात विक्री होते तर १५ ट्रक नारळांना ग्रामीण भागातून मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे निम्म्याहून अधिक जास्त नारळ केवळ जळगाव शहरातच विक्री होत असल्याचे दिसून येते.भावात वाढगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नारळाच्या भावात काहीसी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एका गोणीचे होलसेल भाव एक हजार ४०० रुपये होते. ते या वर्षी एक हजार ५०० ते एक हजार ५५०वर पोहचले आहेत. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळाची आवक कमी झाली होती व आता सण-उत्सवात ही मागणी वाढल्याने भाव वाढले असल्याचे सांगण्यात आले.महिनाभरात ६० ट्रक नारळ विक्रीगणेत्सवासोबतच पोळा, राखी पौर्णिमेलाही नारळाला मागणी असते. राखी पौर्णिमेला औक्षण करताना बहीण आपल्या भावाला श्रीफळ देत असते. तसेच पोळा सणालाही मान म्हणून नारळ दिले जाते. त्यामुळे गेल्या महिनाभरापासूनच नारळाला मागणी वाढली आहे. राखीपौर्णिमेपासून आतापर्यंत नारळातील उलाढाल पाहता ६० ट्रक नारळांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेत्सवापाठोपाठ आता नवरात्रात नारळांना आणखी मागणी वाढणार आहे.गणेत्सवासाठी नारळांना मोठी मागणी वाढून या उत्सवासाठी जवळपास ३५ ट्रक नारळांची विक्री झाली. राखीपौर्णिमेपासून नारळांना मागणी वाढली आहे. यंदा नारळाच्या भावात थोडी वाढ झाली आहे.- अशोक धूत, नारळ व्यापारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव