शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

अमळनेरमधून महिनाभरात बारा तरुण-तरुणी भुर्रर्रर्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : अनलॉक झाल्यानंतर प्रेमवीरांचे प्रेम उफाळून आले आहे. मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : अनलॉक झाल्यानंतर प्रेमवीरांचे प्रेम उफाळून आले आहे. मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्याभरात अमळनेर पोलीस ठाण्याला बारा तरुण-तरुणी पळून गेल्याची नोंद झाली आहे. यातील काहींना तर कायद्याचे ज्ञान नसल्याने अल्पवयातदेखील घरातून निघून जाण्याचे धाडस केले आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिन्याभरात बारा तरुण तरुणी बेपत्ता झाले आहेत. यात १४ जुलैला सानेनगर भागातून ३२ वर्षीय तरुण काही न सांगता निघून गेला, १६ जुलैला सारबेटे येथून ३३ वर्षीय विवाहिता बँकेचे काम करून येते असे सांगून निघून गेली ती परतलेली नाही. १९ जुलैला २५ वर्षीय तरुणी स्टेट बँकेसमोर एका मित्रासोबत निघून गेली.

२१ जुलैला वर्णेश्वर झोपडपट्टीमधून २५ वर्षीय तरुणी काही एक न सांगता निघून गेली. २१ रोजी दहिवद येथून एक तरुण पुण्याहून पीएफचे पैसे घेऊन येतो असे सांगून निघून गेला, तर २२ जुलै रोजी २३ वर्षीय तरुणी दहिवद येथून काही एक न सांगता निघून गेली. २८ जुलै रोजी परीक्षेच्या नावाने २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. ३ ऑगस्ट रोजी एक तरुण रात्री साडेआठ वाजता ढेकू रोडवरून उसनवार पैसे परत देऊ शकला नाही म्हणून पैसे देणाऱ्याने कानशिलात मारल्याने रागात निघून गेला, ८ ऑगस्ट रोजी लोण बुद्रुक येथून २० वर्षीय तरुणी रात्री काही एक न सांगता निघून गेली , तर ११ ऑगस्ट रोजी पातोंडा येथील १९ वर्षीय तरुणी कॉलेजला जाते असे सांगून बेपत्ता झाली तर शहरातील गांधलीपुरा भागातील अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यात आली, तर ११ रोजीच शिरूड नाका परिसरातील २७ वर्षीय तरुणी घरातून न सांगता निघून गेली आहे. असे महिनाभरात १२ तरुण-तरुणी बेपत्ता झाले आहेत.

यात काही तरुण मुलींबरोबर पळून गेल्याचे समजते; मात्र त्यांची हरवल्याची नोंद झालेली नाही.

अनेकदा मुलांसमोरच आई-वडिलांमध्ये वाद होतात. त्यामुळे मुलांना स्वतःच्या कुटुंबाची चीड निर्माण होते. त्यातून ते मित्र-मैत्रिणीचा शोध घेतात आणि एक दिवस कुटुंबाला सोडून जातात. काही कुटुंबात परक्या व्यक्तीशी झालेले प्रेमसंबंध मुलांना चुकीच्या मार्गाने नेण्यास मार्गदर्शक ठरतात.

कोट

हौस, मौज, श्रीमंत मूल-मुलींचे हेवे कर्ज उसनवारी करण्यास मजबूर करतात. त्यामुळेदेखील मुले, मुली वाईट मार्गाला जातात. तारुण्यात मूल-मुलींचे हार्मोन्स बदलतात त्यामुळे त्यांना त्या वयात समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना योग्य ते, संस्कार मूल्यांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, अन्यथा ते चिडतात आणि कुटुंबात दुरावा निर्माण होतो. यामुळे पालकांनी मुलांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष घालणे आवश्यकच आहे.

- जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस ठाणे.

कोट

कुमार अवस्थेत भिन्न लिंगी आकर्षण असणारच त्यासाठी आई-वडिलांनी संस्कार घडविले पाहिजे. कडक शिस्त न ठेवता घरातच इतके प्रेम द्यावे की ते बाहेर प्रेम शोधणारच नाहीत. माध्यमानीदेखील संस्कारक्षम कार्यक्रमांवर भर द्यावा. - डॉ. नंदा तायडे-मोरे, मानसशास्त्र तज्ज्ञ, अमळनेर.