शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

पाण्याच्या बाबतीत बारा महिने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:53 IST

विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़

आसोदा हे गाव जळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे़ मात्र, येथे विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़ वर्षानुवर्षे झाली मात्र, आजपर्यंत एकही ग्रामपंचायत ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे़ उन्हाळ्यात दूषित, पावसाळ्यात गढूळ, हिवाळ्यात टंचाई, असे बाराही महिने पाण्याच्या अडचणींचा ग्रामस्थांना सामना करावा लागतो़ कोणालाच याचे सोयरसुतक नाही़ कोणीही लक्ष द्यायला तयार नाही़ एवढ्या मोठ्या गावासाठी अगदी छोटी पाणीपुरवठा योजना निवडण्यात आल्याने गाव पुन्हा ५० वर्ष मागे गेलेले आहे़ प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांना आता किव येतेय की, ते पाणी टंचाईवर काहीही करू शकत नाही. उन्हाळ्यात जनस्त्रोत आटून पाणी टंचाईची समस्या उद्भवणे हे नैसर्गिक आहे़ पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणे हे ही नैसर्गिक आहे़ मात्र, गावा शेजारी पाणी असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा प्रकार म्हणजे भयावह आहे़ स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, कुठलेली नियंत्रण नसणे, याची प्रचिती म्हणजे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण होय़ अनेक भागात आजही अशा कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ पाणी टंचाईचे फटके अगदी सर्वांनाच सहन करावे लागत आहे़ यात वृद्ध व दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात़ टंचाईबाबत नियोजन नसल्यामुळे पाण्यासाठीची ही वणवण अधिकच वाढली आहे़ अशा स्थितीत स्वच्छ भारत अभियानाचाही गावात बोजवारा उडाला आहे़ कारण पाण्याअभावी शौचालयांचा वापर हा पूर्णत: थांबलेला आहे़ हा मुद्दाही गंभीर आहे, मात्र त्या गांभिर्याने गावाच्या या समस्येकडे बघायला कोणीही तयार नाही़-किशोर चौधरी, पाणी टंचाई निवारण समिती समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव