शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बाबतीत बारा महिने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:53 IST

विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़

आसोदा हे गाव जळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे़ मात्र, येथे विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़ वर्षानुवर्षे झाली मात्र, आजपर्यंत एकही ग्रामपंचायत ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे़ उन्हाळ्यात दूषित, पावसाळ्यात गढूळ, हिवाळ्यात टंचाई, असे बाराही महिने पाण्याच्या अडचणींचा ग्रामस्थांना सामना करावा लागतो़ कोणालाच याचे सोयरसुतक नाही़ कोणीही लक्ष द्यायला तयार नाही़ एवढ्या मोठ्या गावासाठी अगदी छोटी पाणीपुरवठा योजना निवडण्यात आल्याने गाव पुन्हा ५० वर्ष मागे गेलेले आहे़ प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांना आता किव येतेय की, ते पाणी टंचाईवर काहीही करू शकत नाही. उन्हाळ्यात जनस्त्रोत आटून पाणी टंचाईची समस्या उद्भवणे हे नैसर्गिक आहे़ पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणे हे ही नैसर्गिक आहे़ मात्र, गावा शेजारी पाणी असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा प्रकार म्हणजे भयावह आहे़ स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, कुठलेली नियंत्रण नसणे, याची प्रचिती म्हणजे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण होय़ अनेक भागात आजही अशा कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ पाणी टंचाईचे फटके अगदी सर्वांनाच सहन करावे लागत आहे़ यात वृद्ध व दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात़ टंचाईबाबत नियोजन नसल्यामुळे पाण्यासाठीची ही वणवण अधिकच वाढली आहे़ अशा स्थितीत स्वच्छ भारत अभियानाचाही गावात बोजवारा उडाला आहे़ कारण पाण्याअभावी शौचालयांचा वापर हा पूर्णत: थांबलेला आहे़ हा मुद्दाही गंभीर आहे, मात्र त्या गांभिर्याने गावाच्या या समस्येकडे बघायला कोणीही तयार नाही़-किशोर चौधरी, पाणी टंचाई निवारण समिती समन्वयक

टॅग्स :Jalgaonजळगाव