शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावी पासूनच बारावी अभ्यासक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला़ त्यामुळे वर्षभराच्या अभ्यासावरच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभंग आहे.

- अक्षदा पाटील, विद्यार्थिनी

------

परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच दहावी, अकरावी गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर थोडाफार परिणाम होईल.

- ओम पाटील, विद्यार्थी

-------

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते़ परीक्षा होईल, असे वाटत होते़ पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली. ३०-३०-४० या सूत्रांनुसार बारावीचा निकाल लागणार आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळविले. पण, अकरावीला रेस्ट इयर समजून विद्यार्थ्यांनी बारावीला फोकस केले. परिणामी, अकरावीला काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. त्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण, विद्यार्थ्यांनी या निकालाचा ताण न घेता पुढील परीक्षांवर फोकस करावे. सीईटी, जेईई, नीट यासह परीक्षांचा अभ्यास करावा.

- प्रा.अतुल इंगळे, मू.जे़ महाविद्यालय

०००००००००००००

विद्यार्थ्यांनी निकालाचा ताण घेऊ नये. सीईटी, नीट, जेईई या परीक्षांकडे लक्ष द्यावे. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवावा. त्याचप्रमाणे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सीईटीचा अभ्यास सुरू ठेवावा. जेणेकरून त्यांना हवे ते महाविद्यालय प्रवेशासाठी मिळेल.

- प्रा़ शिवराज पाटील, नूतन मराठा महाविद्यालय

००००००००००००००

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी : ४९,४०३

विज्ञान शाखा : २०,१९४

कला शाखा : २०,४९१

वाणिज्य शाखा : ६,२९५

एसीव्हीसी : २,४२३