शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावी पासूनच बारावी अभ्यासक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला़ त्यामुळे वर्षभराच्या अभ्यासावरच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभंग आहे.

- अक्षदा पाटील, विद्यार्थिनी

------

परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच दहावी, अकरावी गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर थोडाफार परिणाम होईल.

- ओम पाटील, विद्यार्थी

-------

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते़ परीक्षा होईल, असे वाटत होते़ पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली. ३०-३०-४० या सूत्रांनुसार बारावीचा निकाल लागणार आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळविले. पण, अकरावीला रेस्ट इयर समजून विद्यार्थ्यांनी बारावीला फोकस केले. परिणामी, अकरावीला काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. त्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण, विद्यार्थ्यांनी या निकालाचा ताण न घेता पुढील परीक्षांवर फोकस करावे. सीईटी, जेईई, नीट यासह परीक्षांचा अभ्यास करावा.

- प्रा.अतुल इंगळे, मू.जे़ महाविद्यालय

०००००००००००००

विद्यार्थ्यांनी निकालाचा ताण घेऊ नये. सीईटी, नीट, जेईई या परीक्षांकडे लक्ष द्यावे. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवावा. त्याचप्रमाणे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सीईटीचा अभ्यास सुरू ठेवावा. जेणेकरून त्यांना हवे ते महाविद्यालय प्रवेशासाठी मिळेल.

- प्रा़ शिवराज पाटील, नूतन मराठा महाविद्यालय

००००००००००००००

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी : ४९,४०३

विज्ञान शाखा : २०,१९४

कला शाखा : २०,४९१

वाणिज्य शाखा : ६,२९५

एसीव्हीसी : २,४२३