शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावी पासूनच बारावी अभ्यासक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला़ त्यामुळे वर्षभराच्या अभ्यासावरच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभंग आहे.

- अक्षदा पाटील, विद्यार्थिनी

------

परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच दहावी, अकरावी गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर थोडाफार परिणाम होईल.

- ओम पाटील, विद्यार्थी

-------

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते़ परीक्षा होईल, असे वाटत होते़ पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली. ३०-३०-४० या सूत्रांनुसार बारावीचा निकाल लागणार आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळविले. पण, अकरावीला रेस्ट इयर समजून विद्यार्थ्यांनी बारावीला फोकस केले. परिणामी, अकरावीला काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. त्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण, विद्यार्थ्यांनी या निकालाचा ताण न घेता पुढील परीक्षांवर फोकस करावे. सीईटी, जेईई, नीट यासह परीक्षांचा अभ्यास करावा.

- प्रा.अतुल इंगळे, मू.जे़ महाविद्यालय

०००००००००००००

विद्यार्थ्यांनी निकालाचा ताण घेऊ नये. सीईटी, नीट, जेईई या परीक्षांकडे लक्ष द्यावे. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवावा. त्याचप्रमाणे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सीईटीचा अभ्यास सुरू ठेवावा. जेणेकरून त्यांना हवे ते महाविद्यालय प्रवेशासाठी मिळेल.

- प्रा़ शिवराज पाटील, नूतन मराठा महाविद्यालय

००००००००००००००

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी : ४९,४०३

विज्ञान शाखा : २०,१९४

कला शाखा : २०,४९१

वाणिज्य शाखा : ६,२९५

एसीव्हीसी : २,४२३