शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
4
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
5
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
6
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
7
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
8
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
9
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
10
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
11
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
12
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
13
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
14
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
15
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
16
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
17
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
18
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
19
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
20
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावी पासूनच बारावी अभ्यासक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे.

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!

बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला़ त्यामुळे वर्षभराच्या अभ्यासावरच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभंग आहे.

- अक्षदा पाटील, विद्यार्थिनी

------

परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच दहावी, अकरावी गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर थोडाफार परिणाम होईल.

- ओम पाटील, विद्यार्थी

-------

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते़ परीक्षा होईल, असे वाटत होते़ पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली. ३०-३०-४० या सूत्रांनुसार बारावीचा निकाल लागणार आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळविले. पण, अकरावीला रेस्ट इयर समजून विद्यार्थ्यांनी बारावीला फोकस केले. परिणामी, अकरावीला काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. त्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण, विद्यार्थ्यांनी या निकालाचा ताण न घेता पुढील परीक्षांवर फोकस करावे. सीईटी, जेईई, नीट यासह परीक्षांचा अभ्यास करावा.

- प्रा.अतुल इंगळे, मू.जे़ महाविद्यालय

०००००००००००००

विद्यार्थ्यांनी निकालाचा ताण घेऊ नये. सीईटी, नीट, जेईई या परीक्षांकडे लक्ष द्यावे. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवावा. त्याचप्रमाणे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सीईटीचा अभ्यास सुरू ठेवावा. जेणेकरून त्यांना हवे ते महाविद्यालय प्रवेशासाठी मिळेल.

- प्रा़ शिवराज पाटील, नूतन मराठा महाविद्यालय

००००००००००००००

जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी : ४९,४०३

विज्ञान शाखा : २०,१९४

कला शाखा : २०,४९१

वाणिज्य शाखा : ६,२९५

एसीव्हीसी : २,४२३