शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

सत्य रक्षणासाठी सत्यच उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:08 IST

प्रापंचिक जीवनातील संसार रथाला कितीही चाक असली तरी देवधर्माचं एक चाकही असणं महत्वाचं आहे. कारण हवा निघून गेलेल्या चाकाच्या ...

प्रापंचिक जीवनातील संसार रथाला कितीही चाक असली तरी देवधर्माचं एक चाकही असणं महत्वाचं आहे. कारण हवा निघून गेलेल्या चाकाच्या ठिकाणी हे एक वेगळं चाक ऐनवेळी कामात पडत. संकटकाळी सर्व उपाय निरुपयोगी ठरतात, त्यावेळी माणूस आपोआप अध्यात्माकडे वळतो. हे समीकरण नुसतं वाचून चालणार नाही तर आचरणात आणनेही महत्वाचे आहे.कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरणाचा प्रसंग म्हणजे त्या सभेतील प्रत्येक शूरवीरांची परीक्षाच होती. धुतराष्ट् हे अंध होते पण विचाराने नव्हे, परंतु पुत्रप्रेमाच्या स्वप्नातून ते सत्य सृष्टीत आले नाही. भीष्म पितामह द्रौपदीचे फार मोठे आशास्थान, मात्र या प्रसंगात ते आपल्या दुर्बल मनाला कुरवाळत बसले. भुजामध्ये शक्ती, बळ असूनही कच्च्या मनापुढे त्यांना हार स्वीकारावी लागली. त्यांचे जीवन हे त्यागमय होते. मात्र यावेळी त्यांच्याही त्यागाला स्वार्थ आडवा आला. गुरू द्रोणाचार्याचं आचार्यपदही कळसूत्री ठरलं. ज्या सभेत वृद्ध नाही ती सभा नाही, धर्माच्या गोष्टी सांभाळत नाहीत ते वृद्ध नाही, ज्यात असत्य आहे तो धर्म नाही, ज्यात छल कपट आहे ते सत्य नाही, दुर्योधनाच्या सभेत सत्य होत, मात्र ते छल कपटांनी भरलं होत. सत्याच्या रक्षणासाठी सत्यच उपयोगाला येतं. द्रौपदीला शेवटी न्याय मिळाला तो तिच्यातल्या सत्य धमार्मुळे. ‘धर्मो रक्षती रक्षित:’ माणसाचे सर्व आधार कमजोर ठरले की तो देवाकडे येतो. धर्म संस्थापक श्रीकृष्णाकडे तिने अब्रू रक्षणासाठी भगवंताकडे याचना केली. श्रीकृष्णा.... या जगात तुझी भक्त-भगिनी एकटी पडली आहे, तुझ्याशिवाय आता मला कोणताच आधार, आश्रय नाही, तू माझा बंधू आहेस ना ? माझ्या लज्जारक्षणाचा राखणदारही तूच आहेस, भगवंता, पुरुषोत्तमा तू भक्तांना सर्व काही देऊ शकतोस, माझी या घडीला लाज राख, पदर पसरून मी तुला आज दान मागते तू तर कृपेचा दयेचा सागर आहेस, त्या कृपेच्या सागरातील एक थेंब तरी माज्या वाट्याला येऊ दे. तू असतांना हे असं घडत आहे. भक्ताचं रक्षण करणं तुझं ब्रीद आहे. त्याची मी तुला आठवण करून देत आहे.तिच्या रोमारोमातून कृष्णाचा महाजप सुरू होता. भगवंताच्या ब्रिदाची त्याला पुन्हां पुन्हा आठवण करून देतांना डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूपुरांनी ती न्हाऊन निघत होती. भगवंतांनी द्रौपदीला त्यावेळी जी वस्त्रे पुरवली, त्यातील प्रत्येक धाग्यांनी तिची लाज राखली. सभेतील सर्वांनी तोंड फिरवून खाली माना घातल्या, मात्र धर्म कधीही तोंड फिरवत नाही व खालीही पाहत नाही.- वासुदेव चव्हाण, शहापूर ता.जामनेर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव