शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

सत्य रक्षणासाठी सत्यच उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:08 IST

प्रापंचिक जीवनातील संसार रथाला कितीही चाक असली तरी देवधर्माचं एक चाकही असणं महत्वाचं आहे. कारण हवा निघून गेलेल्या चाकाच्या ...

प्रापंचिक जीवनातील संसार रथाला कितीही चाक असली तरी देवधर्माचं एक चाकही असणं महत्वाचं आहे. कारण हवा निघून गेलेल्या चाकाच्या ठिकाणी हे एक वेगळं चाक ऐनवेळी कामात पडत. संकटकाळी सर्व उपाय निरुपयोगी ठरतात, त्यावेळी माणूस आपोआप अध्यात्माकडे वळतो. हे समीकरण नुसतं वाचून चालणार नाही तर आचरणात आणनेही महत्वाचे आहे.कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरणाचा प्रसंग म्हणजे त्या सभेतील प्रत्येक शूरवीरांची परीक्षाच होती. धुतराष्ट् हे अंध होते पण विचाराने नव्हे, परंतु पुत्रप्रेमाच्या स्वप्नातून ते सत्य सृष्टीत आले नाही. भीष्म पितामह द्रौपदीचे फार मोठे आशास्थान, मात्र या प्रसंगात ते आपल्या दुर्बल मनाला कुरवाळत बसले. भुजामध्ये शक्ती, बळ असूनही कच्च्या मनापुढे त्यांना हार स्वीकारावी लागली. त्यांचे जीवन हे त्यागमय होते. मात्र यावेळी त्यांच्याही त्यागाला स्वार्थ आडवा आला. गुरू द्रोणाचार्याचं आचार्यपदही कळसूत्री ठरलं. ज्या सभेत वृद्ध नाही ती सभा नाही, धर्माच्या गोष्टी सांभाळत नाहीत ते वृद्ध नाही, ज्यात असत्य आहे तो धर्म नाही, ज्यात छल कपट आहे ते सत्य नाही, दुर्योधनाच्या सभेत सत्य होत, मात्र ते छल कपटांनी भरलं होत. सत्याच्या रक्षणासाठी सत्यच उपयोगाला येतं. द्रौपदीला शेवटी न्याय मिळाला तो तिच्यातल्या सत्य धमार्मुळे. ‘धर्मो रक्षती रक्षित:’ माणसाचे सर्व आधार कमजोर ठरले की तो देवाकडे येतो. धर्म संस्थापक श्रीकृष्णाकडे तिने अब्रू रक्षणासाठी भगवंताकडे याचना केली. श्रीकृष्णा.... या जगात तुझी भक्त-भगिनी एकटी पडली आहे, तुझ्याशिवाय आता मला कोणताच आधार, आश्रय नाही, तू माझा बंधू आहेस ना ? माझ्या लज्जारक्षणाचा राखणदारही तूच आहेस, भगवंता, पुरुषोत्तमा तू भक्तांना सर्व काही देऊ शकतोस, माझी या घडीला लाज राख, पदर पसरून मी तुला आज दान मागते तू तर कृपेचा दयेचा सागर आहेस, त्या कृपेच्या सागरातील एक थेंब तरी माज्या वाट्याला येऊ दे. तू असतांना हे असं घडत आहे. भक्ताचं रक्षण करणं तुझं ब्रीद आहे. त्याची मी तुला आठवण करून देत आहे.तिच्या रोमारोमातून कृष्णाचा महाजप सुरू होता. भगवंताच्या ब्रिदाची त्याला पुन्हां पुन्हा आठवण करून देतांना डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूपुरांनी ती न्हाऊन निघत होती. भगवंतांनी द्रौपदीला त्यावेळी जी वस्त्रे पुरवली, त्यातील प्रत्येक धाग्यांनी तिची लाज राखली. सभेतील सर्वांनी तोंड फिरवून खाली माना घातल्या, मात्र धर्म कधीही तोंड फिरवत नाही व खालीही पाहत नाही.- वासुदेव चव्हाण, शहापूर ता.जामनेर.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव