शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सेना, काँग्रेस, राष्टÑवादीची खरी कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 13:13 IST

सर्व २० जागांवर मुलाखती आटोपून भाजपचे शिवसेनेवर दबावतंत्र ; २००९ च्या समीकरणात बदल होणार ?, वारसदारांना संधी देण्याचा मातब्बर नेत्यांचा प्रयत्न ; जुना-नवा संघर्ष चिघळू न देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील २० जागांसाठी तब्बल २२६ उमेदवारांनी मुलाखती दिल्याने भाजपचा उत्साह आणि आत्मविश्वास दुणावला आहे. सक्षम, तुल्यबळ आणि वजनदार उमेदवार मुलाखतीसाठी आल्याने भाजपची इच्छा स्वबळावर निवडणूक लढण्याची असली तर त्यात वावगे काही म्हणता येणार नाही. खरी कसोटी ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडीची आहे. भाजपसारख्या मोठ्या भावांकडून ‘वाटा’ मिळविताना सेनेची दमछाक होणार आहे. काँग्रेस आघाडीला तुल्यबळ उमेदवार शोधण्याची वेळ अनेक मतदारसंघात आली आहे. त्यातून ते कसे मार्ग काढतात, यावर समीकरण अवलंबून राहील.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेश विसर्जनंतर केव्हाही लागू शकते. काहींच्या मते १३ रोजी तर काहींच्या मते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा संपल्यावर म्हणजे १९ नंतर लागू शकते. याचा अर्थ दहा दिवसात कधीही निवडणूक घोषित होऊ शकते. प्रशासकीय तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने गेल्याच आठवड्यात घेतला असल्याने बिगूल वाजला आहेच.भाजपने खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील मुलाखती आटोपल्या आहेत. राज्यमंत्री मदन येरावार आणि मिलिंद पाटील या निरीक्षकांनी मुलाखती घेतल्या. ‘इनकमिंग’ वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन मुलाखतीच्यावेळी कुणालाही रोखले गेले नाही. प्रत्येक उमेदवाराला किमान १० मिनिटे वेळ देण्यात आला. प्रत्येक उमेदवाराशी बोलून त्याचा दृष्टीकोन, निवडून येण्याची क्षमता, निवडणुकीसाठी त्याच्याकडील संसाधने (रिसोर्सेस), कार्य आदींची माहिती घेतली गेली. या मुलाखतीचा अहवाल आणि सर्वेक्षणाचा अहवाल एकत्रित करुन प्रदेश समिती तीन उमेदवारांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविणार आहे, असे मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांना अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत आशा ठेवायला हरकत नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्याकडे भाजपचा प्रयत्न राहणार आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या मतदारसंघात कोणीही उमेदवारी मागितलेली नाही, यावरुन पक्षावरील त्यांची पकड दिसून येते. याउलट एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात ८, डॉ.विजयकुमार गावीत यांच्या नंदुरबारात ४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.वारसदारांना संधी देण्याचा प्रयत्न नेत्यांचा दिसून येत आहे. चाळीसगावात खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील, माजी मंत्री डॉ.शालिनी बोरसे यांच्या कन्या डॉ.माधुरी बाफना, मनोहर भदाणे यांचे पूत्र राम भदाणे, माजी मंत्री गो.शि.चौधरी यांच्या कन्या विद्या बागूल, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावीत, आमदार उदेसिंग पाडवी यांचे पूत्र राजेश पाडवी, कुवरसिंग वळवी यांचे पूत्र विशाल वळवी, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी मुलाखती दिलेल्या असून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.नंदुरबारच्या जिल्हाध्यक्ष खासदार डॉ.हीना गावीत यांचे पिता व भगिनी, धुळ्याचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जळगावचे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.एरंडोल आणि धुळे शहर हे मतदारसंघ २००९ च्या युतीच्या समीकरणानुसार सेनेकडे होते. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर हे मतदारसंघ भाजपने जिंकले. चिमणराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यासाठी सेनेला ही जागा हवी आहे, मात्र भाजपकडे एकाहून अधिक तुल्यबळ उमेदवार असल्याने या जागेवरुन पेच निर्माण होऊ शकतो. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांना हेरण्याचे प्रयत्न आता काँग्रेस आघाडीकडून सुरु आहेत. कारण ही मंडळी मूळची काँगे्रेसजन आहे, असे समर्थन केले जाऊ शकते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव