शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

इटारसीजवळ रेल्वे रुळावर झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

भुसावळ : मध्य प्रदेशात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मध्य रेल्वेतील इटारसीजवळ रेल्वे रुळांवर अनेक झाडे पडली. ओएचईच्या ...

भुसावळ : मध्य प्रदेशात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मध्य रेल्वेतील इटारसीजवळ रेल्वे रुळांवर अनेक झाडे पडली. ओएचईच्या तारा तुटल्या. विद्युत खांब वाकले. परिणामी हावडा, ताप्ती गंगा एक्स्प्रेससह इतर गाड्या उशिराने धावत आहेत.

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात गुर्रा-बगरतवा स्टेशनदरम्यान झालेल्या वादळामुळे अनेक झाडे रेल्वे रुळावर पडली. याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अप-डाऊन रेल्वे वाहतूक दोन्ही ट्रॅकवर थांबली होती. ताप्ती गंगा एक्स्प्रेस, हावडा, काशी, राप्ती सागर, गुवाहाटी, छपरा, साकेत, मंडुआडिह, पाटलीपु्त्र, महानगरी एक्स्प्रेससह इतर गाड्यांची चाके थांबली. या गाड्या गुरुरा, बगरतवा, सोनतलाई, सोहागपूर, इटारसीसह अन्य स्थानकांवर उभ्या केल्या आहेत. इटारसी आणि पिपरिया रेल्वेस्थानकांवरून टॉवर व्हॅन दुरुस्तीच्या कामासाठी निघाली. गुर्रा-बगरतवादरम्यान ओएचई वायरवर बरीच झाडे पडल्याचे वृत्त आहे.

तसेच भुसावळ स्थानकावर येणाऱ्या गाड्यांच्या विलंबाची परिस्थिती शुक्रवारी रात्रीपर्यंत राहणार आहे. ०८६०९ अप, रांची-लो.टि.टर्मिनस रांची एक्स्प्रेस ८.३० तास उशिरा धावत आहे. ०२१९४ अप, वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस ५.४० तास उशिरा धावत आहे. ०२३२१ अप हावडा-मुंबई कलकत्ता मेल ५.२५ तास उशिरा धावत आहे. ०२१४२ अप पाटलीपुत्र- लो. टि. टर्मिनस पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेस सहा तास उशिरा धावत आहे. ०२१६८ अप, मंडुआडिह-लो. टि. टर्मिनस वाराणसी सुपरफास्ट एक्स्प्रेस ५.४० तास उशिरा धावत आहे. ०१०६८ अप, फैजाबाद- लो. टि. टर्मिनस साकेत एक्स्प्रेस, अडीस तास उशिरा धावत आहे. ०१०६० अप छपरा-लो. टि. टर्मिनस छपरा एक्स्प्रेस, सात तास उशिरा धावत आहे. ०९१४८ अप भागलपूर- सुरत भागलपूर एक्स्प्रेस १.१५ तास उशिरा धावत आहे. ०५०१८ अप गोरखपूर-लो. टि. टर्मिनस काशी एक्स्प्रेस अडीच तास उशिरा धावत आहे. ०५६४६ अप गौहाटी- लो. टि. टर्मिनस गुवाहाटी एक्स्प्रेस १.१५ तास उशिरा धावत आहेत.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे झाडे व झाडाच्या फांद्या रेल्वे रुळावर पडल्या. ओव्हरहेड इलेक्ट्रिकल (ओएचई ) लाइनदेखील खराब झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ४.४८ पासून रेल्वे ट्रॅक बंद आहे. इटारसी-पिपरिया रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे टॉवर व्हॅनची टीम सुधारण्याचे काम करीत आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर मुंबई व दिल्ली मार्ग सुरळीत करण्यात आला.