शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

वृक्ष लागवड मोहिमेचा ‘फज्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:18 IST

तीन वर्षांत हजारो झाडे लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही झाड जगलेले नाही

सचिन देवजळगाव : शासनाच्या वृक्ष संवर्धन मोहिमे अंतर्गंत दरवर्षी मनपातर्फे मेहरुण तलाव परिसरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गंत तीन वर्षांत या ठिकाणी हजारो झाडे लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही झाड जगलेले दिसुन आले नाही. वृक्ष संवर्धन ज्या पद्धतीने जोमात केले, तितके मात्र रोपांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या वृक्ष संवर्धन मोहिमेचा ‘फज्जा ’उडालेला दिसून आला आहे. त्यामुळे फक्त चमकोगिरी पुरताच ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे मत समस्त जळगावकरांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.वाढत्या वृक्ष तोडीमुळे, जगलांचे क्षेत्र कमी होऊन याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. यामुळे पावसाचे क्षेत्र घटले असुन, ‘ग्लोबल वार्मिंग’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार करुन, महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपासुन वृक्ष लागवड मोहिम सुरु केली आहे. दरवर्षी जुलैमध्ये शासनाच्या वनविभागातर्फे आठवडाभर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व रस्त्यांलगत वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गंत रोपे लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जुलै मध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व अधिकाऱ्यांची यंत्रणा ही मोहिम यशस्वी करण्यासाठी राबराब राबत असते. मागेल त्या ‘मोफत’ रोप देऊन झाडे लावण्याचे आवाहन केले जाते. जिल्हाभरात दरवर्षी या मोहिमे अंतर्गंत लाखो-झाडे लावण्यात येत आहेत. मात्र, लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच लागवड केलेल्या रोपांची अत्यंत विदारक अवस्था दिसुन येते.जळगाव मनपा पर्यावरण विभागाने मेहरुण परिसरात तीन वर्षांत हजारो झाडे लावण्याचा दावा केला. यामध्ये काही झाडे जगल्याचाही दावा केला. मात्र, प्रत्यक्षात गेल्या आठवड्यांत ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, हजारो रोपांपैकी ‘पाच’ रोपे देखील जगलेली दिसुन आली नाहीत. काही रोपे पाळीव प्राण्यांनी नष्ट केली तर काही जळुन नष्ट झाली. मेहरुण तलावाच्या परिसरात फक्त जागोजागी खड्डे पडलेले दिसुन आले. यातील काही खड्डे तर पाला-पाचोळा व मातीने भरलेले दिसुन आले. अशा प्रकारे मेहरुण परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा पुर्णत: फज्जा उडालेला दिसुन आला. मोठा-गाजावाजा करुन शासनातर्फे दरवर्षी वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येत असुन, ही मोहिम आतापर्यंत कागदोपत्रीच राबविण्यात आली का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव