शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेचा ‘फज्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:18 IST

तीन वर्षांत हजारो झाडे लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही झाड जगलेले नाही

सचिन देवजळगाव : शासनाच्या वृक्ष संवर्धन मोहिमे अंतर्गंत दरवर्षी मनपातर्फे मेहरुण तलाव परिसरात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गंत तीन वर्षांत या ठिकाणी हजारो झाडे लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही झाड जगलेले दिसुन आले नाही. वृक्ष संवर्धन ज्या पद्धतीने जोमात केले, तितके मात्र रोपांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या वृक्ष संवर्धन मोहिमेचा ‘फज्जा ’उडालेला दिसून आला आहे. त्यामुळे फक्त चमकोगिरी पुरताच ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे मत समस्त जळगावकरांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.वाढत्या वृक्ष तोडीमुळे, जगलांचे क्षेत्र कमी होऊन याचा परिणाम पर्यावरणावर झाला आहे. यामुळे पावसाचे क्षेत्र घटले असुन, ‘ग्लोबल वार्मिंग’चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार करुन, महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांपासुन वृक्ष लागवड मोहिम सुरु केली आहे. दरवर्षी जुलैमध्ये शासनाच्या वनविभागातर्फे आठवडाभर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विविध शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व रस्त्यांलगत वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गंत रोपे लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जुलै मध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व अधिकाऱ्यांची यंत्रणा ही मोहिम यशस्वी करण्यासाठी राबराब राबत असते. मागेल त्या ‘मोफत’ रोप देऊन झाडे लावण्याचे आवाहन केले जाते. जिल्हाभरात दरवर्षी या मोहिमे अंतर्गंत लाखो-झाडे लावण्यात येत आहेत. मात्र, लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच लागवड केलेल्या रोपांची अत्यंत विदारक अवस्था दिसुन येते.जळगाव मनपा पर्यावरण विभागाने मेहरुण परिसरात तीन वर्षांत हजारो झाडे लावण्याचा दावा केला. यामध्ये काही झाडे जगल्याचाही दावा केला. मात्र, प्रत्यक्षात गेल्या आठवड्यांत ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, हजारो रोपांपैकी ‘पाच’ रोपे देखील जगलेली दिसुन आली नाहीत. काही रोपे पाळीव प्राण्यांनी नष्ट केली तर काही जळुन नष्ट झाली. मेहरुण तलावाच्या परिसरात फक्त जागोजागी खड्डे पडलेले दिसुन आले. यातील काही खड्डे तर पाला-पाचोळा व मातीने भरलेले दिसुन आले. अशा प्रकारे मेहरुण परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा पुर्णत: फज्जा उडालेला दिसुन आला. मोठा-गाजावाजा करुन शासनातर्फे दरवर्षी वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येत असुन, ही मोहिम आतापर्यंत कागदोपत्रीच राबविण्यात आली का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव