शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सणासुदीत ‘मेगाब्लॉक’ प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:14 IST

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ४ ते ५ तास लेट

जळगाव : रेल्वेतर्फे ऐन सणासुदीत मंगळवारी बºहाणपूर जवळ चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळच्या सत्रातील मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या ४ ते ५ तासांने विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांना स्टेशनावर गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनातर्फे विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात तर पावसामुळे अनेक गाड्या ८ ते १० विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला. असे असतांना ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी खंडवा ते बºयानपुर दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान मेगाब्लॉक घ्यावा लागला.यामुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या वेळापत्रकानुसार ४ ते ५ तासाने विलंबाने धावल्या. खंडवा ते बºहाणपूर दरम्यान सुरु असलेल्या मेगाब्लॉकच्या कामामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.निवडणुकीच्या कामात लालपरी अडकल्याने प्रवाशाचींही गैरसोयसोमवारी जळगाव आगारातील २५ बसेस निवडणूक कामासाठी घेण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा या बसेस आगारात दाखल झाल्या. यामुळे सायंकाळी घराकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. तर दुसºया दिवशी पुन्हा गुजरातहून मागविलेल्या पोलीस बंदोबस्तला सोडण्यासाठी नऊ बसेस सोमवारी पहाटे गुजराथला रवाना झाल्या. तर पाच बसेस मुंबईच्या पोलिसांना सोडण्यासाठी गेल्या. यामुळे काही गावांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन, प्रवाशांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागला.हजारो प्रवासी स्टेशनावर ताटकळलेमेगाब्लॉकमुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस साडेचार तास लेट, कर्नाटक एक्सप्रेस तीन तास, मुंबई एलटीटी एक्सप्रेस तीन तास, पुष्पक चार तास, कामायानी एक तास व कुशीनगर एक्सप्रेस दोन तासाने विलंबाने धावली. विशेष म्हणजे जळगाव स्टेशनावर मुंबईला जाण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत एकही गाडी उपलब्ध नव्हती. यामुळे नाशिक-मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पहात ताटकळत बसावे लागले. या प्रकाराबद्दल प्रवाशांतर्फे रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव