शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सीमोल्लंघन कोरोनाचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:12 IST

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत लेखिका विशाखा विलास देशमुख...

शरद ऋतूत उत्साह, चैतन्य घेऊन येणारा सण दसरा. अश्विन महिन्याच्या दशमीला विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी असंही म्हणतात. निसर्गाशी सुसंवाद साधण्यासाठी अनेक सण आपल्या संस्कृतीत आहेत. त्याला धार्मिक महत्त्व असतं. तसंच वैज्ञानिक कारणही असतं. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. पांडवांनी वनवासातून परतताना शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे याच दिवशी बाहेर काढली. प्रभू रामचंद्रांनी सोन्याच्या लंकेवर चाल केली तीही याच मुहूर्तावर. रामायण व महाभारत दोन्हींची आठवण करून देणारा एकमेव सण म्हणजे दसरा होय. अजूनही सायंकाळी गावाच्या वेशीवर जाऊन घरातील पुरुष मंडळी आपट्याची पानं आणतात. पानं आणल्यावर त्यांना ओवाळलं जातं. मगच घरी आलेल्यांना आपण ती देऊन शुभेच्छा देतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यानं अत्यंत पवित्र मानला जातो. नवरात्रीची सांगता या दिवशी असल्याने नऊ दिवसांच्या उपवासाची देवीला नैवेद्य दाखवून सांगता करतात. या काळात झेंडूच्या फुलांचं महत्त्व असतं. नवरात्रीत घटाला रोज माळा, दसऱ्याच्या दिवशी दाराची तोरणं लक्ष वेधून घेतात. काही वस्तू या निर्जीव दिसत असल्या तरी आपल्या जीवनात त्यांचं खूप महत्त्व असतं. किंबहुना त्यांच्यामुळेच आपलं जीवन सुखकर होत असतं. आपलं वाहन, जे आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवत असतं त्या गाडीचीही पूजा केली जाते. हा शुभ दिवस असल्यानं सोनं तसेच वस्तूंची खरेदी केली जाते. सरस्वती बुध्दीची देवता. या दिवशी तिचं खास स्मरण केलं जातं. सकाळी देवापुढे पाट ठेवून अभ्यासाची पुस्तकं, हिशेबाची वही, नवीन कपडे, पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. सरस्वतीच्या हातात वीणा असते. तिला संगीत प्रिय असल्यानं या दिवशी संगीतप्रेमी आपल्या वाद्यांची पूजा करून सरस्वतीचा आशीर्वाद घेतात. दिवाळीची चाहूल घेणारा हा आनंदाचा सण सगळ्यांनाच सुखावून जातो. लहान मुलं तर नवीन कपडे घालून, घरोघरी जाऊन भरपूर चॉकलेट वसूल करतात, तर तरुण पिढी गरबा खेळून पदन्यासाने तालासुरात रंगून जातात. पण यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं तो आनंद घेता आला नाही. सार्वजनिक स्वरूप साजरे करता आले नाही.रावण दहनातून दुष्ट प्रवृत्तीचा नाश सूचित केला जातो. सर्व अमंगळ जाऊन मांगल्याकडे नेणारा दसरा आनंदाचा असतो.यंदा जरी उत्साह कमी असला तरी दसरा साजरा करू या.-विशाखा देशमुख, जळगाव

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJalgaonजळगाव