शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बारीपाड्याचा कायापालट करणारा किमयागार : चैत्राम पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:29 IST

जळगाव येथील डॉ.मंजूषा पवनीकर यांनी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा (ता.साक्री) येथे नुकतीच भेट दिली. तेथील जनजीवन, वस्तुस्थिती जवळून पाहिली. त्यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेला लेख...

सातपुडा व सह्याद्रीच्या मधोमध वसलेला बारीपाडा नावाचा छोटासा वनवासी पाडा; पण चैत्राम पवार या किमयागाराने २७ वर्षांची मेहनत घेऊन या पाड्याचा कायापालट केलाय आणि बारीपाड्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविलंय. सात-सहा वर्षांपासून चैत्राम पवार यांच्याविषयी ऐकत्येय; पण भेटीचा योग जुळून येत नव्हता. अचानक तो आला.धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेला बारीपाडा हा अतिशय दुर्गम पाडा. पिंपळनेरनंतर अनेक फाटे पार करीत विचारत विचारत आम्ही बारीपाड्याला पोहोचलो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले गाव; पण प्रसिद्धीपासून अलिप्त याचे आश्चर्य वाटले. बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहीत नव्हते; परंतु चैत्राम पवार यांच्याविषयी बोलताना या गोष्टींचा उलगडा झाला.तरुण वयात संघाशी संबंध आला. त्यातून पाड्याचा विकास हेच ध्येय त्यांनी ठेवले. एम.कॉम. ही पदवी घेतली; परंतु आपल्या बांधवांनी प्रगती करावी, ही मनस्वी इच्छा बाळगली. मग साकारले बारीपाड्यातील विविध उपक्रम.वनवासी संस्कृतीची जपवणूक व संवर्धनबारीपाडा व आजूबाजूच्या सर्व पाड्यांवर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पिकांना कोणतेही रासायनिक खत देण्यात येत नाही. वृक्षांचा आदर करणारी वनवासींची संस्कृती आजही तेथे जपली जात आहे. अगदी प्रदूषण होते म्हणून गावात चैत्रामजींनी बससेवा नाकारली. पाड्यावर दोनच रिक्षा दळणवळणाचे काम करतात. एरव्ही लोक पायीच जातात. फोन नाही, मोबाइल टॉवर नाही. पशु-पक्ष्यांना मुक्तपणे व स्वच्छ वातावरण मिळावे ही चैत्रामजींची इच्छा. अगदी त्यांच्या घराच्या परिसरात ठिकठिकाणी रिकामे डबे, मोठे पाईप उंचावर बांधून ठेवलेय, चिमण्यांना घरटे म्हणून. शहरात नष्ट झालेली चिमणी-चिमणा शेकडोंच्या संख्येने तिथे आम्ही पाहिलेत.चैत्रामजी सांगतात, या जमिनीला निसर्गाचा आशीर्वाद आहे. इथे कोणतेही बी टाका, ते बहरतेच. याची प्रचिती म्हणजे फणस, सफरचंद यासारखी फळेसुद्धा येतायेत. वनवासी बांधव आपल्या गरजेपुरतेच कमावतात व धान्य साठवितात. त्यातीलच काही भाग बियाणे म्हणून वापरतात. त्यांना कधीच बाहेरून बियाणे आणण्याची गरज पडत नाही. तांदळाचा इंद्रायणी हा प्रकार विकसित केला. लवकरच तो प्रसिद्ध झाला. आज हजारो टन इंद्रायणी तांदूळ विक्री होत आहे. सोलर ड्रायरच्या माध्यमातून मोड आलेली मटकी, पालेभाज्या, कांदा कोरडा केला जातो. याची विक्री करण्याची योजना आहे.जंगलाची निर्मितीउजाड माळरानावर चैत्रामजींच्या २७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे ११०० हेक्टर जंगल पसरले आहे. हे जंगल इतके दाट आहे की, जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशदेखील पोहोचत नाही. आज चारशेवर विविध पक्ष्यांच्या जाती येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या वातावरणात स्ट्रॉबेरी व मशरूमचे पीक त्यांनी घेतले आहे. सध्या सफरचंदाची लागवड केली आहे.वनभाजी महोत्सवबारीपाड्याला खरी ओळख मिळाली, ती वनभाजी महोत्सव या अनोख्या स्पर्धेमुळे. २००४ पासून ही स्पर्धा चैत्रामजी घेत आहेत. पौष्टिक व दुर्मीळ अशा वनभाज्यांची ओळख जगाला करून देण्याचा हा उपक्रम आहे. साध्या पद्धतीने बनविलेल्या वनभाज्या पाड्यावरील महिलांनी करून आणायच्या व त्याचे औषधी गुणधर्म, कोणत्या रोगांवर किंवा दुखण्यावर त्या लाभदायक ठरू शकतात, याची माहिती द्यायची, अशी ही अनोखी स्पर्धा. जैवविविधता व आरोग्याच्या दृष्टीने या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आज प्राप्त झाले आहे. हजारो लोक या स्पर्धेच्या निमित्ताने बारीपाड्याला भेट देतात. गेल्या वर्षी विजेत्या महिलेने १५० भाज्या तयार केल्या होत्या व त्याचे आयुर्वेदिक महत्त्वही विशद केले होते. अशा प्रोत्साहनपर उपक्रम चैत्रामजी राबवत आहेत.चैत्रामजींच्या या अथक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना व बारीपाड्याला अनेक पुरस्कार व सन्मान मिळालेत. जर्मनी व कॅनडा येथील संशोधकांनी बारीपाड्यावर पीएच.डी. केलीय. २०१४ ला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम समितीने येथे भेट दिली. देशभरातून अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी गट येथे पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी येतात. जंगल, जमीन, जल, जन व जनावर या पाच मुद्यांवर चैत्रामजी काम करीत आहेत. जैवविविधता जपणे, जंगल संस्कृतीची राखण करण्याचे महत्त्वाचे काम ते करीत आहेत.हे करीत असताना आपण काही तरी वेगळे करीत आहोत, असा अभिनिवेश त्यांचा नाही. केंद्रीय पर्यावरण समितीमध्ये त्यांची निवड झालीय. अत्यंत साधी राहणारी. घरी येणाºया प्रत्येकाचे योग्य आदरातिथ्य, आपुलकीची वागणूक याची प्रचिती आम्ही घेतली. त्यांचा पीए नाही की असिस्टंट. विमल वहिनींची समर्थ साथ त्यांना मिळाली आहे. आपण जगावेगळे काम करीत आहोत, याचा लवलेशही या दाम्पत्यामध्ये नाही. हे बघून आपण नतमस्तक होतो. आपण हजारो, लाखो रुपये खर्च करून तीर्थक्षेत्रांना जातो. माझ्या मते बारीपाड्यासारख्या तीर्थक्षेत्रांना आपण भेटी दिल्या पाहिजेत.डॉ.मंजूषा पवनीकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव