शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जळोद-बुधगाव पुलाचे हस्तांतर रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:15 IST

अमळनेर : दुरुस्ती झाल्याशिवाय जलसंपदाकडून पूल ताब्यात घेण्यास बांधकाम विभागाची ना

अमळनेर : चोपडाव अमळनेर तालुक्याला जोडणारा तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अल्पावधीत या  पुलालगतचा भराव खचला.  रस्त्यावर खड्डे पडले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. मात्र तेवढा निधी मिळत नसल्याने, जलसंपदा विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे हस्तांतरण रखडलेले आहे. तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून 1999 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2011 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा हा पूल असल्याने, या पुलावरून वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर वाढली. मात्र  पुलाच्या  दोन्ही बाजूला असणा:या रस्त्याची  दुर्दशा झाली. रस्त्यालगतचा असणारा भराव खचला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत,.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भराव काटेरी झुडपांनी वेढला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे.पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची आहे. पुलाच्या भरावांची आणि खडय़ांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 28 लाख रुपये खर्च लागणार आहेत.  या वर्षी जलसंपदा विभागाला केवळ सहा कोटीचा निधी शासनाकडून मिळाल्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या चोपडा कार्यालयाने सांगितले.तर पुल सुस्थित असल्याशिवाय ताब्यात घेणार नसल्याचे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर कार्यालयाने स्पष्ट केले आहे.या पुलामुळे चोपडा,शिरपूर आणि मध्यप्रदेशाला जाण्यासाठीचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेतदेखील बचत होत असते,गेल्या पाच वर्षात पुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामानाने पुलाची आणि पुलाच्या भरावांची काळजी घेण्यात आली नाही.पूल जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची काळजी घेतली जात नाही. पुलाच्या हस्तांतर बाबत जलसंपदा विभाग  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संयुक्तपणे पुलाला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी  हस्तांतर प्रक्रिया सुरू केली आहे.    (वार्ताहर)