शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जळोद-बुधगाव पुलाचे हस्तांतर रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:15 IST

अमळनेर : दुरुस्ती झाल्याशिवाय जलसंपदाकडून पूल ताब्यात घेण्यास बांधकाम विभागाची ना

अमळनेर : चोपडाव अमळनेर तालुक्याला जोडणारा तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अल्पावधीत या  पुलालगतचा भराव खचला.  रस्त्यावर खड्डे पडले. ही सर्व दुरुस्ती करण्यासाठी सव्वादोन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. मात्र तेवढा निधी मिळत नसल्याने, जलसंपदा विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलाचे हस्तांतरण रखडलेले आहे. तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून 1999 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2011 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा हा पूल असल्याने, या पुलावरून वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर वाढली. मात्र  पुलाच्या  दोन्ही बाजूला असणा:या रस्त्याची  दुर्दशा झाली. रस्त्यालगतचा असणारा भराव खचला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत,.पुलाच्या दोन्ही बाजूच्या भराव काटेरी झुडपांनी वेढला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे.पुलाचे बांधकाम जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्तीची जबाबदारी या विभागाची आहे. पुलाच्या भरावांची आणि खडय़ांच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हात वर केले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी 28 लाख रुपये खर्च लागणार आहेत.  या वर्षी जलसंपदा विभागाला केवळ सहा कोटीचा निधी शासनाकडून मिळाल्याने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या चोपडा कार्यालयाने सांगितले.तर पुल सुस्थित असल्याशिवाय ताब्यात घेणार नसल्याचे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर कार्यालयाने स्पष्ट केले आहे.या पुलामुळे चोपडा,शिरपूर आणि मध्यप्रदेशाला जाण्यासाठीचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेतदेखील बचत होत असते,गेल्या पाच वर्षात पुलावरील वाहतूक वाढली आहे. त्यामानाने पुलाची आणि पुलाच्या भरावांची काळजी घेण्यात आली नाही.पूल जलसंपदा विभागाकडे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची काळजी घेतली जात नाही. पुलाच्या हस्तांतर बाबत जलसंपदा विभाग  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संयुक्तपणे पुलाला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी  हस्तांतर प्रक्रिया सुरू केली आहे.    (वार्ताहर)