शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव, पारोळा दौ-यादरम्यान पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:48 IST

चारा, पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

चाळीसगाव, जि. जळगाव : यावर्षीचा दुष्काळ भयावह असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चाराही उपलब्ध नसल्याने शेतक-यांसह पशुपालकही धास्तावले आहेत. शासनाने तातडीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करुन पिण्याचे पाण्याचे टँन्कर सुरु करावे. पाण्याअभावी करपलेल्या फळबागांचे देखील तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी हिरापुर व वाघळी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर व वाघळी येथील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या.सकाळी नऊ वाजता पालकमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-याला सुरुवात झाली. चाळीसगाव शहरापासून आठ किमी अंतरावरील पश्चिमेला असणा-या हिरापुर येथे त्यांनी भेट दिली. यावेळी येथे सरपंच रंजना आबा वराडे यांनी दुष्काळी परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याकडे लक्ष वेधतांना टँन्करच्या फे-या बरोबर होत नाही. त्या दिवसाला सहा असाव्यात अशी मागणी केली. गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम थांबले असून वलठाण धरणातून योजनेसाठी पाणी उपलब्ध करुन दिले जात नसल्याचे सांगितले. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा. अशीही मागणी शेतक-यांनी केली.यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पिण्याच्या पाण्याबाबत काय समस्या आहे. याची माहिती गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडून घेतली. टँकरच्या सहा फे-या शनिवारपासूनच सुरु करा अशा सुचना केल्या. चारा छावण्यांबाबत संस्थांनी पुढे यावे. त्यांना यासाठी अनुदान दिले जाईल. चारा छावण्या व्यक्तीला नव्हे तर संस्थांना दिल्या जातात.वाघळी येथे फळबागांची पाहणीवाघळी येथे पालकमंत्र्यांनी भडगाव रोड लगतच्या रमाकांत महाजन यांच्या लिंबू तर अशोक व अभिमन्यू महाजन या दोन्ही बंधूंच्या लिंबूसह चिकु बागेची पाहणी केली. पाणी नसल्याने फळबागांचे नुकसान झाल्याची कैफियत शेतक-यांनी मंत्र्यांना ऐंकवली. जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे यांनी फळबागांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान मिळवून देण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शासन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून 'मागेल त्याला चारा, मागेल त्याला पाणी' अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी अश्वासित केले. दुष्काळग्रस्तांना शासन वा-यावर सोडणार नाही. दुष्काळ असतांना सुरु करावयाच्या आठ उपाययोजनांसाठी शासन बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी, चारा आणि रोजगार यांना शासन स्तरावर प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले.दौ-यात त्यांच्या समवेत आमदार उन्मेष पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पं.स.सदस्य भाऊसाहेब पाटील, प्रा. सुनील निकम आदी उपस्थित होते. दरम्यान वाघळी गावात गेल्या ९० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असून पालकमंत्र्यांनी गावात येऊन गावक-यांना धीर देणे गरजेचे होते. त्यामुळे हा दुष्काळ पाहणी दौरा एक फार्स होता. असा आरोप सरपंच विकास चौधरी यांनी केला आहे.दरम्यान, पारोळा तालुक्यातील तरवाडे येथेही पालकमंत्र्यांनी १० मिनिट भेच देऊन चर्चा केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव