शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

चाळीसगाव, पारोळा दौ-यादरम्यान पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:48 IST

चारा, पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

चाळीसगाव, जि. जळगाव : यावर्षीचा दुष्काळ भयावह असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चाराही उपलब्ध नसल्याने शेतक-यांसह पशुपालकही धास्तावले आहेत. शासनाने तातडीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करुन पिण्याचे पाण्याचे टँन्कर सुरु करावे. पाण्याअभावी करपलेल्या फळबागांचे देखील तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी हिरापुर व वाघळी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर व वाघळी येथील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या.सकाळी नऊ वाजता पालकमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-याला सुरुवात झाली. चाळीसगाव शहरापासून आठ किमी अंतरावरील पश्चिमेला असणा-या हिरापुर येथे त्यांनी भेट दिली. यावेळी येथे सरपंच रंजना आबा वराडे यांनी दुष्काळी परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याकडे लक्ष वेधतांना टँन्करच्या फे-या बरोबर होत नाही. त्या दिवसाला सहा असाव्यात अशी मागणी केली. गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम थांबले असून वलठाण धरणातून योजनेसाठी पाणी उपलब्ध करुन दिले जात नसल्याचे सांगितले. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा. अशीही मागणी शेतक-यांनी केली.यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पिण्याच्या पाण्याबाबत काय समस्या आहे. याची माहिती गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडून घेतली. टँकरच्या सहा फे-या शनिवारपासूनच सुरु करा अशा सुचना केल्या. चारा छावण्यांबाबत संस्थांनी पुढे यावे. त्यांना यासाठी अनुदान दिले जाईल. चारा छावण्या व्यक्तीला नव्हे तर संस्थांना दिल्या जातात.वाघळी येथे फळबागांची पाहणीवाघळी येथे पालकमंत्र्यांनी भडगाव रोड लगतच्या रमाकांत महाजन यांच्या लिंबू तर अशोक व अभिमन्यू महाजन या दोन्ही बंधूंच्या लिंबूसह चिकु बागेची पाहणी केली. पाणी नसल्याने फळबागांचे नुकसान झाल्याची कैफियत शेतक-यांनी मंत्र्यांना ऐंकवली. जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे यांनी फळबागांचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान मिळवून देण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शासन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून 'मागेल त्याला चारा, मागेल त्याला पाणी' अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी अश्वासित केले. दुष्काळग्रस्तांना शासन वा-यावर सोडणार नाही. दुष्काळ असतांना सुरु करावयाच्या आठ उपाययोजनांसाठी शासन बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी, चारा आणि रोजगार यांना शासन स्तरावर प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले.दौ-यात त्यांच्या समवेत आमदार उन्मेष पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पं.स.सदस्य भाऊसाहेब पाटील, प्रा. सुनील निकम आदी उपस्थित होते. दरम्यान वाघळी गावात गेल्या ९० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट असून पालकमंत्र्यांनी गावात येऊन गावक-यांना धीर देणे गरजेचे होते. त्यामुळे हा दुष्काळ पाहणी दौरा एक फार्स होता. असा आरोप सरपंच विकास चौधरी यांनी केला आहे.दरम्यान, पारोळा तालुक्यातील तरवाडे येथेही पालकमंत्र्यांनी १० मिनिट भेच देऊन चर्चा केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव