शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

जिल्ह्यात मुसळधार; पारोळ्यात सर्वाधिक ८० मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचे कमबॅक झाले असून, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचे कमबॅक झाले असून, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी जिल्ह्यात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस २८.८ मिमी मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद मंगळवारीच झाली आहे. तब्बल १५ दिवसांच्या खंडानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, कापूस, मका व केळीला या पावसामुळे फायदा होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे १९६.१ मिलीमीटर इतके असून, यावर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ६७.९ मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ३४.६ टक्के इतका पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस अद्यापही कमी झालेला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कमी पावसामुळे यंदा खरीप हंगामाच्या एकूण उत्पादनात ५० टक्क्यांची घट येण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस (पाऊस मिमीमध्ये)

तालुका - आतापर्यंत झालेला पाऊस - १७ रोजी झालेला पाऊस - एकूण टक्केवारी

जळगाव - ३१५.३ - ४० - ६६.१ टक्के

भुसावळ- २९२.२ - ४२.९ - ६९.६ टक्के

यावल- २९२ - ४५.१ - ६५ टक्के

रावेर- ३२४ - ४६.१ - ७६ टक्के

मुक्ताईनगर- २४७ - २८.८ - ३९ टक्के

अमळनेर- २६२ - ६४.९ - ६५ टक्के

चोपडा- २३३ - ४०.७ - ५० टक्के

एरंडोल- ४०६ - ५७.३ - ९६ टक्के

पारोळा- ४८३ - ८० - ११३ टक्के

चाळीसगाव- ४२७ - ५३.४ - १०९ टक्के

जामनेर- ३६६ - ५२.३ - ७८ टक्के

पाचोरा- ३६४ - ४९.७ - ८६ टक्के

भडगाव- ३५५ - ५९ - ८४ टक्के

धरणगाव- ३८८ - ४५ - ७३ टक्के

बोदवड- ३१८ - ३१ - ७३ टक्के

उशिरा लागवड केलेल्या सोयाबीनला फायदा

अनेक दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे उडीद, मूग व सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसामुळे उडीद व मुगाला फारसा फायदा झालेला नाही. आधीच मूग व उडदाचे नुकसान झाले असून, मंगळवारी झालेला पाऊसदेखील या पिकांना जीवदान देऊ शकलेला नाही तर उशिराने लागवड झालेल्या सोयाबीनला काही प्रमाणात फायदा होणार आहे, तर कोरडवाहू कापसाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. यासह केळीला व मक्यालादेखील या पावसामुळे फायदा होणार आहे.

पारोळ्यात सर्वाधिक तर मुक्ताईनगरात सर्वात कमी पाऊस

जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतच्या सरासरीच्या एकूण ३३३.४ मि.मी. म्हणजेच ७८ टक्के इतका पाऊस झाला आहे. पारोळ्यात तालुक्यात एकूण सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच ११३ टक्के इतका पाऊस झाला आहे, तर मुक्ताईनगर तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ३९ टक्के इतका पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू होत असतो, गेल्या दोन वर्षात परतीचा पाऊस नियमित मान्सूनच्या पावसापेक्षाही जास्त झाला आहे. यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.