शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या बाजारपेठेत टमाटे वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:02 IST

५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने टमाट्याचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याचे दर ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात १००० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल असलेल टमाट्याचे दर हे १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. टमाट्यासह इतरही भाज्यांचे दर वाढतच आहे. दोन आठवड्यांपूर्वी वधारलेले वांग्याचे दर सध्या स्थिर असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटलवरून ३५० ते ११०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.या सोबतच कारले १४०० ते ३००० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, भेंडी ११०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, कैरी २०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १२०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, गवार - २५०० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - १००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ४०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक १६०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची १८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - ८०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, गिलके १००० ते २८०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - १२०० ते ३२०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव