शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जळगाव जिल्ह्यात शेतकरी संपामुळे टमाटे, हिरवी मिरची कडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:11 IST

भाजीपाला लिलाव सुरळीत

ठळक मुद्देकर्नाटकातील आंब्याची आवक थांबलीधान्य बाजारातही परिणाम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसºया दिवशीही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून मराठवाडामार्गे आंबे घेवून येणारी वाहने न आल्याने आंब्याची आवक घटली आहे. सोबतच टमाटे व हिरवी मिरचीची आवक कमी झाल्याने टमाट्याचे भाव दुप्पट तर मिरचीचे भाव दीडपटीने वाढले आहे.शेतमालास हमी भाव व संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये बदल करावा या याप्रमुख मागण्यांसाठी शेतकºयांच्या देशव्यापी संपास १ जून पासून सुरूवात झाली. संपाचा आज दुसरा दिवस होता.कर्नाटकातील आंबा थांबलाजळगावात संपाचा फारसा परिणाम नसला तरी कर्नाटकातून आंबे घेऊन येणारी वाहने जळगावात येऊ शकली नाही. ही वाहने मराठवाडामार्गे येतात. परिणामी दक्षिण भारतातील आंबा येथे येणे थांबला आहे. मात्र गुजरातमधून आंब्याची आवक सुरू असल्याने आंब्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही.टमाटे, हिरवी मिरचीची आवक घटलीमराठवाड्यातील काही भागासह पाटणादेवी येथून येणाºया टमाट्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोनच दिवसात टमाट्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहे. बाजार समितीमध्ये ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ३० ते ४० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.हिरवी मिरचीदेखील उत्तर भारतातून येत असल्याने दोन दिवसांपूर्वी निघालेला माल येथे येऊ शकला, मात्र पुढे काही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचेही भाव १५०० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते २५०० रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. आधीच उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने त्यांचे भाव वाढलेले आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे.धान्याचीही आवक थांबलीसंपामुळे धान्य विक्रेतेही बाजार समितीत धान्य आणत नसल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी ५० टक्केच आवक होऊ शकली व दुसºया दिवशी शनिवारी तर आवक नसल्या सारखीच होती, असे व्यापाºयांनी सांगितले.शेतकरी संप काळात ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याबाबत सूचना असून त्यानुसार मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात आहे. सर्व बाजार समितींनाही सूचना देण्यात आल्या असून २४ तास लक्ष ठेवून आहे.- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधकशेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी धान्याची ५० टक्केच आवक होऊ शकली व २ रोजी तर आवक नसल्यासारखीच होती.- शशी बियाणी, धान्य व्यापारी.संपाच्या दुसºया दिवशी भाजीपाल्याचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून येणाºया आंब्याची वाहने येऊ शकली नाही. सध्या टमाटे व हिरवी मिरचीची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहेत.- वासुदेव पाटील, सुपरवायझर, कृउबा, जळगाव. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपJalgaonजळगाव