शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

२७ मृत लोकांच्या नावाने काढले शौचालयाचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

बोदवड जि.जळगाव : स्वच्छ भारत अभियानात २७ मृत लोकांच्या नावाने प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी बोगस खाते उघडून उकळल्याचा ...

बोदवड जि.जळगाव : स्वच्छ भारत अभियानात २७ मृत लोकांच्या नावाने प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी बोगस खाते उघडून उकळल्याचा प्रकार तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. केवळ मृतांच्या नाही तर गावातील ३८० लोकांच्या नावावर आलेल्या तब्बल ५० लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे.

फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२० या सात महिन्यांच्या कालावधीत शेलवड ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी गावातील पाच ते तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने स्वच्छ भारत अभियानात व्यक्तीगत शौचालयासाठी प्रत्येकी बारा हजार रुपयांप्रमाणे मिळणारा निधी काढून घेतला. यासाठी मृतांच्या नावाने बोगस खाते जामनेर येथे उघडण्यात आले.

या प्रकरणात ग्रामसेवक संदीप निकम यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ यांची नाशिक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने चौकशी झाली आहे, तसेच याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बोटे यांनी चौकशी केली; मात्र यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने तक्रारदार व शेलवडचे ग्रा.पं. सदस्य दीपक माळी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत तत्कालीन बीडीओ आर. ओ. वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

कोट

शेलवड ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोग अपहारप्रकरणी विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे. शेलवड ग्रामपंचायतीचे जेवढे दप्तर उपलब्ध झाले आहे, त्याप्रमाणे कारवाई केली आहे. - संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी, बोदवड.