शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

२७ मृत लोकांच्या नावाने काढले शौचालयाचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

बोदवड जि.जळगाव : स्वच्छ भारत अभियानात २७ मृत लोकांच्या नावाने प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी बोगस खाते उघडून उकळल्याचा ...

बोदवड जि.जळगाव : स्वच्छ भारत अभियानात २७ मृत लोकांच्या नावाने प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी बोगस खाते उघडून उकळल्याचा प्रकार तालुक्यातील शेलवड ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. केवळ मृतांच्या नाही तर गावातील ३८० लोकांच्या नावावर आलेल्या तब्बल ५० लाखांच्या निधीचा अपहार झाला आहे.

फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२० या सात महिन्यांच्या कालावधीत शेलवड ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी गावातील पाच ते तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने स्वच्छ भारत अभियानात व्यक्तीगत शौचालयासाठी प्रत्येकी बारा हजार रुपयांप्रमाणे मिळणारा निधी काढून घेतला. यासाठी मृतांच्या नावाने बोगस खाते जामनेर येथे उघडण्यात आले.

या प्रकरणात ग्रामसेवक संदीप निकम यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी आर.ओ. वाघ यांची नाशिक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने चौकशी झाली आहे, तसेच याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बोटे यांनी चौकशी केली; मात्र यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने तक्रारदार व शेलवडचे ग्रा.पं. सदस्य दीपक माळी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत तत्कालीन बीडीओ आर. ओ. वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

कोट

शेलवड ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोग अपहारप्रकरणी विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवला आहे. शेलवड ग्रामपंचायतीचे जेवढे दप्तर उपलब्ध झाले आहे, त्याप्रमाणे कारवाई केली आहे. - संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी, बोदवड.