शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे ग्रामस्थांचे तितूर पात्रालगत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 20:09 IST

तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ झाले आक्रमकवाळूमाफियांविरुद्ध कठोर कारवाई कराजिल्हाधिकाऱ्यांनी भेट द्यावी-ग्रामस्थांची मागणी

चाळीसगाव, जि.जळगाव : तितूर नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी झालेल्या वाळूचा पंचनामा करुन वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी हिंगोणे, ता.चाळीसगाव येथील २७ ग्रामस्थांनी १ रोजी सकाळी १० वाजता हिंगोणे गावालगत नदीपात्रालगत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या मागणीला संतप्त ग्रामस्थांनीही पाठिंबा देवून उपोषणस्थळी ठिय्या मांडला आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे.या उपोषणात तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, सोसायटी चेअरमन सयाजी पाटील, बाळासाहेब गजमल पाटील, अरविंद चव्हाण, मांगो पाटील, गणेश कोष्टी, गुलाबराव चव्हाण, दीपक चव्हाण, गोविंदराव पाटील, सुरेश चव्हाण, दिलीप पाटील, भगवान पाटील, बाळु पाटील, कैलास पाटील, भगवान पाटील, संजय सुतार, शांताराम चव्हाण, योगेश चव्हाण, अनिकेत चव्हाण, एकनाथ कोष्टी, अभिमान सूर्यवंशी, धनराज चव्हाण, रवींद्र पाटील आदी सहभागी झाले आहे.२२ रोजी पहाटे तीनला माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी व त्यांच्या दोन साथीदारांनी जेसीबी व डंपरमधून वाळूची चोरी करीत असताना ग्रामस्थांनी अडवले व प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर तिघांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या वर्षभरापासून तितूर नदी पात्रातून वाळूचा अमाप उपसा करण्यात आला. याबाबत तहसीलदार व पोलिसांना अनेकवेळा सांगूनही त्याकडे दुर्लक्ष झाले म्हणून संतप्त ग्रामस्थांनी हा पावित्रा उचलला. त्यामुळे चौधरी व त्यांच्या सहकाºयांनी ग्रामस्थांना धमक्याही दिल्या होत्या. तसेच चौधरी यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंगोणे ग्रामस्थांनी आठ दिवसाआधी केली होती. प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर १ रोजी ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.दरम्यान, ३१ रोजी प्रांत व तहसीलदार यांनी नदीपात्रस्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. या पंचनाम्यावरही ग्रामस्थांचा आक्षेप आहे. नदीपात्रातून वर्षभरात झालेल्या वाळू उत्खननाची मोजमाप करावे व सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध दंडाची आकारणी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.जिल्हाधिकारी किेशोरराजे निंबाळकर यांनी हिंगोणे गावी येवून घटनास्थळी भेट द्यावी. त्यांच्या भेटीने संबंधित अधिकारी वस्तुस्थितीचा पंचनामा करतील आणि वाळू माफियांविरुद्ध निश्चित कारवाई होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनChalisgaonचाळीसगाव