शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

टिंगरी वाद्य मोजतेय अखेरच्या घटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 16:38 IST

एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देमनोरंजनाची कला टिंगरी वाद्य पडद्याआड जाणार कला व कलाकार जिवंत राहण्यासाठी मानधन मिळण्याची अपेक्षा

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : एखाद्या गाजलेल्या घटनेवर रचलेले व जनतेला खिळवून ठेवणारे पोवाडे, भक्ती गीते, मोठा वाद्यवृंदांंचा लवाजवा नसताना फक्त टिंगरीच्या सहाय्याने मंत्रमुग्ध करून सोडणारी भराडी लोककला (नाथजोगी) वेगाने धावपळ वाढलेल्या जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.सध्या इंटरनेटसह वेगवेगळ्या साईटसवर माहिती व मनोरंजनाचा खजाना आहे. एका क्लिकवर पाहिजे ती माहिती उपलब्ध होते, कधीकाळी सिनेमा हाऊसफुल्ल असायचे, तर बैठक रुमची शान असलेल्या चांगल्या वाईट काळात आवडीचे संगीत ऐकवणारी यंत्रणा म्हणजे रेडिओ, टेपरेकार्डर, सीडी, डिव्हीडी, होम थिएटरदेखील मृत्यू शय्येवर पडल्यागत झाले आहे. त्यांची जागा टीव्ही व मोबाईलने घेतली आहे.पण त्याच्या आधीच्या काळी फक्त रेडिओ हेच तेवढे मनोरंजनाचे साधन होते. काही ठरावीक घरात रेडिओ असायचा. तमाशे, नाटक हेदेखील आकर्षक होते. पण त्याकाळी भराडी मंडळी ज्यांना काही भागात नाथजोगी म्हटले जाते. ते आपल्या या टिंगरी वाद्याने जनतेचे मनोरंजन करीत असत. दोन पोकळ लाकडी पाईपाला विशिष्ट तारा बांधून दुसऱ्या लाकडी पाईपच्या तारेने आवडीचे सुर काढून घुंगरुंच्या तालावर वेगवेगळ्या लकबीत वाजवून त्यावर पोवाडे गीत बसवले जाते. हे पोवाडे ग्रामीण जनतेचे आकर्षण होते. धार्मिक, देशभक्ती तसेच समाजातील एखाद्या गाजलेल्या घटनेवर सुंदर वर्णनासह पोवाडे ऐकवले जायचे. या मनोरंजनातून मिळणाºया पैशातून या नाथजोगी कुटुंबाचा संसारगाडा चालत होता. टिंगरीवाला गावखेड्यात आला की, एखाद्या निंबाच्या झाडाखाली किंंवा आंब्याच्या झाडाच्या सावलीत मैफील सजायची. मोठी गर्दी जमा व्हायची. आवडीचा पोवाडा म्हणण्याची फर्माईश व्हायची. त्यावर खूश होऊन जो तो आपापल्या परीने बक्षिसे देत होते. परंतु हल्लीच्या धावपळीच्या व भयंकर सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या जगात या कलेची गरज व आवड संपल्याने ही कला काळाच्या ओघात नष्ट पावत चालली आहे. या कलाकारांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न त्यांच्या उतरत्या वयात निर्माण झाला आहे. कारण ही कला जोपासणारी ही शेवटची पिढी हल्ली शिल्लक आहे. नवे पोरं याविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हा भारतीय वारसा पुढेदेखील सुरू रहावा, ही कला लुप्त होऊ नये, यासाठी प्रयत्न होणे अथवा या नाथजोगी समाजातील कलाकारांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.हे टिंगरी वाद्य कधीकाळी एवढे लोकप्रिय होते की, ग.दि.माडगूळकरांच्या कथेवर आधारित डाकूंमध्ये मानसिक सुधारणा घडवून आणणारा १९६०च्या दशकातील 'दो आँखे बारा हाथ' ह्या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या हातात संपूर्ण चित्रपटात हेच वाद्य दाखवण्यात आले आहे. याच वाद्यावर आधारित अत्यंत गाजलेले गाणे ‘सैंया झुठोंका बडा सरताज निकला’ हेदेखील चित्रीत करण्यात आलेले होते. त्यानंतर या वाद्याचा उपयोग अनेक चित्रपटात झालेला होता. यावरून या वाद्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावा.वयाच्या सातव्या वर्षापासून टिंगरी वाजवतो आहे. त्याकाळी अत्यंत गरिबी होती. खायला मिळत नव्हते. टिंगरी वाजवून पोवाडा म्हटल्यावर भाकरी मिळायची. कुणी पैसे दोन पैसे द्यायचे तर कुणी पाच, दहा पैसे द्यायचे. उपजीविका छान व्हायची. अख्खा महाराष्ट्रात फिरलो आहे. २५ ते ३० पोवाडे तोंडपाठ असतात. त्यात राजा कोळी सायगव्हाण, नाल्या मांग निजामपूर, गुलब्या नाईक मालेगाव, गणेश वकील डोकलखेडे या त्याकाळी गाजलेल्या घटनांवरचे हे पोवाडे लोक अत्यंत तन्मयतेने ऐकत असत. आमची कला हल्ली कोणी ऐकत नाही. उपजीविकेचे साधन नष्ट होत आहे. सरकारने आम्ही हल्ली जे संबंध महाराष्ट्रात मिळून १५ ते २० कलाकार शिल्लक आहोत, आमच्या उतारवयाच्या उपजीविकेसाठी आर्थिक मदत करावी. आम्हाला पेंशन अथवा मानधन सुरू करावे, अशी मागणी नाथजोगी समाजाचे महिंदळ्याचे ७० वर्षीय शंकर सायबू भराडी यांनी यानिमित्ताने केली आहे.

टॅग्स :artकलाErandolएरंडोल