शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:55 IST

हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी ...

ठळक मुद्देअर्धवट केळी गुरांच्या घशातभाव आहे पण केळी नाहीशेतकऱ्यांचे नियोजन चुकलेजलसिंचन सुविधा होणे अपेक्षित

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परिसरात पुरेशा पाण्याअभावी केळी बागा उपटून फेकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच जलपातळी झपाट्याने खालावत आहे. अपूर्ण पाण्यामुळे लागवडीनंतर काही महिन्यातच केळी लागवड केलेली असता उपटून फेकण्याचे अस्मानी संकट येऊन केळीबाग फेकावी लागल्याने खरीप हंगामासह रब्बीलाही मुकावे लागले आहे.अगोदरच केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नव्हता. उशिराने कशी बशी लागवड केली. त्यामुळे मध्येच कूपनलिका व विहिरीचे पाणी अचानक कमी झाल्याने लावलेल्या केळीची मेहनतही वाया गेली व खर्चही वाया गेला आहे. त्यातच खरिपाच्या हगमलाही मुकावे लागले आहे.पुरेशा पाण्याअभावी केळी फेकावी लागत आहेपरिसरात विहीर खोदकाम नवीन ट्यूूबवेळ करण्यासाठी शेतकरी पैसा खर्च करून केवळ नशीब आजमावत आहे. पण पाण्याचा थेंबही लागत नसल्याने पदरी निराशाच पडत आहे. उभे आडवे बोअरवेल करूनसुद्धा लक्षणीय घट दिसून येत आहे. दरवर्षी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पुरेपूर पाण्याची विहीर सापडणे कठीण झाले आहे. एप्रिल-मे महिन्यात जे श्रम करावे लागतात, ते आतापासूनच करावे लागत आहे. कांदे बागांची लागवडीत लक्षणीय घट झाली आहे.लाख मोलाची केळी गुरांच्या घशातपावसाळ्यात लावलेली केळी उन्हाळ्यात फेकण्याची वेळ येते. ही वेळ हिवाळ्यातच अली आहे. सुकलेली केळी गुरांच्या घशात जात आहे. दरवर्षी असा आर्थिक फटका बसत आहे. कायमस्वरूपी जलसिंचन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर