शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मध्यप्रदेशात प्रवेश बंदीमुळे दररोज तीन लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती : सध्या रावेरपर्यंतच बससेवा उपलब्ध जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसेसला बंदी घालण्यात ...

वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती : सध्या रावेरपर्यंतच बससेवा उपलब्ध

जळगाव : कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसेसला बंदी घालण्यात आल्यामुळे, एस. टी. महामंडळाच्या जळगाव विभागाचे दररोज तीन लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली, तर सध्या बसेस बऱ्हाणपूरपर्यंत न जाता रावेर आगारापर्यंतच जात असल्याचेही बंजारा यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, खबरदारी म्हणून मध्यप्रदेश सरकारने परराज्यातून येणाऱ्या बसेसला बंदी घातली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांतून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसेसची सेवा तीन दिवसांपासून बंद आहे. महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव आगारासह, भुसावळ, चोपडा, यावल, एरंडोल व रावेर आगारातून एकूण ४८ फेऱ्या बऱ्हाणपूर येथे धावत होत्या. बऱ्हाणपूर व खंडवा या भागात मोठ्या प्रमाणावर मराठी बांधव असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातून महामंडळाला दररोज तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. सणासुदीला तर चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे ही सेवा बंद झाल्यामुळे महामंडळाला दररोज तीन लाखांचा फटका बसत आहे. आधीच कोरोनामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असताना, आता उत्पन्नाच्या मार्गावरील बसेस बंद झाल्यामुळे महामंडळाच्या तोट्यात अधिकच भर पडली आहे.

इन्फो :

सध्या रावेरपर्यंतच सेवा

कोरोनामुळे मध्यप्रदेशात या बसेस जात नसल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध आगारांतील बसेस या रावेरपर्यंतच जात आहेत. त्या ठिकाणाहून बऱ्हाणपूर आगाराच्या बसने प्रवासी मध्यप्रदेशात जात आहेत. मात्र, मध्यप्रदेशातील बसेस या महाराष्ट्रात बिनधास्तपणे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही या बसेसला बंदी घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

इन्फो

...तर कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यावरच मध्य प्रदेशात प्रवेश

मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला प्रवेश बंदी केल्यामुळे, जळगाव जिल्ह्यातील बसेस सध्या रावेरपर्यंतच जात आहेत. रावेरहून बऱ्हाणपूर आगाराच्या बसेसने मध्यप्रदेशात जाता येते. मात्र, मध्य प्रदेशात जाण्यासाठी महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे गरजेचे आहे. तेथील वाहकाला हा निगेटिव्ह अहवाल दाखवल्यावरच बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या प्रवाशाला बसमध्ये परवानगी देण्यात येत आहे. याबाबत बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव विभागाला पत्र पाठविले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी केले आहे.