शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

जिल्ह्यातील २४ लाख लाभार्थ्यांना मिळणार तीन महिन्याचे मोफत तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:05 IST

प्रत्येक महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांमधून पुढील तीन महिन्यांसाठी प्रती महिना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २४ लाख ६०४ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यात एकाच वेळी तीन महिन्यांचा तांदूळ मोफत मिळणार नाही, तर तो दर महिन्याला दिला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्राहकांना तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. तसेच आता तीन महिने तांदूळदेखील मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ३९ हजार ८९५ लाभार्थ्यांना मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे तर मोफत तांदूळचा जिल्ह्यातील २४ लाख ६०४ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यात अंत्योदय योजनेतील एक लाख ३७ हजार ५४९ लाभार्थ्यांना तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत २२ लाख ६३ लाख ५५ लाभार्थ्यांना तीन महिने प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जूनचे धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने १९ मार्चला घेतला तसेच केंद्र सरकारकडून ३० मार्चला एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचा निर्णय झाला. मात्र तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास स्वस्त धान्य दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकीरीचे होईल तसेच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याच्या निर्णय घेतल्याने दोन दिवसात धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधा पत्रिका (रेशन कार्ड) धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र शिधा पत्रिका धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ त्या-त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव