शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

नशिराबादला साडेतीन हजार कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:58 IST

फसवणूक होत असल्याची तक्रार, तहसीलदारांना निवेदन

नशिराबाद : येथील ३ हजार ५०० कुटुंबांना सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रेशन कार्डचा उपयोग फक्त नागरी रहिवासी पत्त्यासाठी होत असून खऱ्या लाभापासून अर्थात धान्यापासून कुटुंब वंचित आहे. महिनाभरात कुटुंबियांना धान्यपुरवठा सुरू न झाल्यास अन्यथा मंत्रालयात धाव घेणार असल्याचे ेमाजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केला आहे.माजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नशिराबाद येथे पाच स्वस्त धान्य दुकाने आहेत. एकूण सहा हजार कुटुंब रेशन कार्डधारक आहे त्यापैकी २ हजार ५०० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत आहे. मात्र सुमारे ३५०० कुटुंबे धान्यापासून अद्यापही वंचित आहेत. अनेकदा ओरड होवूनही याकडे दुर्लक्ष झाले. वंचित कुटुंबियांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.ज्या कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य मिळत आहे, त्यांचीसुद्धा दुकानदारांकडून लुबाडणूक व पिळवणूक होत आहे. अनेकदा तक्रार येवूनही याकडे डोळेझाक होत आहे.येथील रहिवासी अनिल वामन कोल्हे यांचे रेशनकार्ड नशिराबाद येथील स्वस्त धान्य दुकानदार हिरालाल चौधरी यांच्या दुकानाची संलग्न आहे. कोल्हे यांच्या कुटुंबात चार सदस्य असल्यावर त्यांना प्रत्यक्षात तीन लोकांचे रेशन धान्य मिळत आहे. मात्र आॅनलाइन डाटा तपासणी केली असता, त्या कुटुंबाला प्रत्यक्ष बारा किलो गहू व नऊ किलो तांदूळ एवढे धान्य मिळायला पाहिजे. गरीब व अडाणी समाजबांधवाची फसवणूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले अहे. त्यांना प्रत्यक्षात नऊ किलो गहू व सहा किलो तांदूळ मिळत आहे. संबंधित दुकानदारांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनातील मागण्यागावातील तीन हजार पाचशे कुटुंबास व जळगाव तालुक्यातील स्वस्त धान्यापासून वंचित अन्य कुटुंबांनाही त्वरित धान्य सुरू करण्यात यावे.नशिराबाद गावात स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेली लूबाडणूक थांबवावी.रेशनदूकानदारांची चौकशी व कारवाई करावी.गावातील साडेतीन हजार वंचित कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून एक महिन्यात धान्य न मिळाल्यास सर्व वंचितांना घेऊन १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात धडक देऊन हा गंभीर विषय मार्गी लावण्याकरिता साकडे घालण्यात येईल निवेदनात म्हटले आहे.गावात काही दुकानांमध्ये रेशनकार्डधारकांचे ठसे मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेही धान्य देण्यास टोलवाटोलवी होती, असा अनुभव काही ग्राहकांना येत असल्याची ओरड व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव