शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नशिराबादला साडेतीन हजार कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:58 IST

फसवणूक होत असल्याची तक्रार, तहसीलदारांना निवेदन

नशिराबाद : येथील ३ हजार ५०० कुटुंबांना सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रेशन कार्डचा उपयोग फक्त नागरी रहिवासी पत्त्यासाठी होत असून खऱ्या लाभापासून अर्थात धान्यापासून कुटुंब वंचित आहे. महिनाभरात कुटुंबियांना धान्यपुरवठा सुरू न झाल्यास अन्यथा मंत्रालयात धाव घेणार असल्याचे ेमाजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केला आहे.माजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नशिराबाद येथे पाच स्वस्त धान्य दुकाने आहेत. एकूण सहा हजार कुटुंब रेशन कार्डधारक आहे त्यापैकी २ हजार ५०० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत आहे. मात्र सुमारे ३५०० कुटुंबे धान्यापासून अद्यापही वंचित आहेत. अनेकदा ओरड होवूनही याकडे दुर्लक्ष झाले. वंचित कुटुंबियांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.ज्या कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य मिळत आहे, त्यांचीसुद्धा दुकानदारांकडून लुबाडणूक व पिळवणूक होत आहे. अनेकदा तक्रार येवूनही याकडे डोळेझाक होत आहे.येथील रहिवासी अनिल वामन कोल्हे यांचे रेशनकार्ड नशिराबाद येथील स्वस्त धान्य दुकानदार हिरालाल चौधरी यांच्या दुकानाची संलग्न आहे. कोल्हे यांच्या कुटुंबात चार सदस्य असल्यावर त्यांना प्रत्यक्षात तीन लोकांचे रेशन धान्य मिळत आहे. मात्र आॅनलाइन डाटा तपासणी केली असता, त्या कुटुंबाला प्रत्यक्ष बारा किलो गहू व नऊ किलो तांदूळ एवढे धान्य मिळायला पाहिजे. गरीब व अडाणी समाजबांधवाची फसवणूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले अहे. त्यांना प्रत्यक्षात नऊ किलो गहू व सहा किलो तांदूळ मिळत आहे. संबंधित दुकानदारांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनातील मागण्यागावातील तीन हजार पाचशे कुटुंबास व जळगाव तालुक्यातील स्वस्त धान्यापासून वंचित अन्य कुटुंबांनाही त्वरित धान्य सुरू करण्यात यावे.नशिराबाद गावात स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेली लूबाडणूक थांबवावी.रेशनदूकानदारांची चौकशी व कारवाई करावी.गावातील साडेतीन हजार वंचित कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून एक महिन्यात धान्य न मिळाल्यास सर्व वंचितांना घेऊन १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात धडक देऊन हा गंभीर विषय मार्गी लावण्याकरिता साकडे घालण्यात येईल निवेदनात म्हटले आहे.गावात काही दुकानांमध्ये रेशनकार्डधारकांचे ठसे मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेही धान्य देण्यास टोलवाटोलवी होती, असा अनुभव काही ग्राहकांना येत असल्याची ओरड व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव