शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’शंभर कोटींमधून अद्याप एक ‘दमडी’च्याही कामाला सुरुवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:43 IST

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. ...

जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत दीड वर्षापुर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील सुरुवात झालेली नाही. वर्षभरात शहराचा चेहरा- मोहरा बदलविणाच्या दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून अद्याप शासनाने दिलेल्या निधीचेही नियोजन करता आलेले नाही. दोन महिन्यांपुर्वी मंजूर झालेल्या ४२ कोटींच्या कामांचीही निविदा अद्याप काढण्यात आली नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.१६ आॅगस्ट २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोथ्थान अंतर्गत शहरासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिनाभरातच शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी आणल्यामुळे मनपातील सत्ताधाºयांनी आश्वासन पाडल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, १०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यावर देखील शहरातील नागरिकांच्या समस्या आहेत त्या आजही कायम आहेत. या निधीतून रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, काम सुरु न झाल्याने सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत.दरम्यान, याबाबत महापालिकेत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व मनपा अधिकाºयांचा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ही बैठक होवू शकली नाही. दोन दिवसात याबाबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली. स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी देखील याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना निविदा प्रक्रियेबाबत माहिती विचारली होती. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी नगरोथ्थानमधील कामांची छाननी प्रक्रिया सुरु असल्याने निविदा प्रक्रिया थांबली होती. मात्र, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले असल्याची माहिती स्थायी समिती सभापतींनी दिली.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहे काम-नगरोथ्थान मधून १०० कोटी पैकी ४२ कोटी रुपयांचा निधीतून होणाºया कामांना ८ आॅगस्ट रोजी शासनाकडून मंजूरी मिळाली होती. तसेच शासनाने या कामे मनपाकडून न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचाही सूचना दिल्या होत्या.- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील तीन महिन्यात साधी निविदा प्रक्रिया देखील राबवता आलेली नाही. त्यात २१ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काम थांबले असावे मात्र, पूर्ण आॅगस्ट महिना व त्यानंतर आता नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यावर देखील निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली नाही. त्यामुळे कामे रखडली आहे.अजून चार महिने तरी खड्डयांपासून सुटका नाही ?-४२ कोटी रुपयांच्या निधीतून काही यापैकी ४२ कोटी रुपयांमधून १३० कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यात १६ कोटी रुपयांमधून शिवाजी नगर उड्डाणपूल ते दुध फेडरेशनपर्यंतचा रस्ता, कालींका माता मंदिर ते जुना खेडी रस्त्यापर्यंतचा २४ मीटरच रुंद रस्ता तयार करण्यासह दुभाजक तयार करण्यात येणार आहे.-रायसोनीनगर जकातनाका ते मनपा हद्दीपर्यंतचा १८ मीटरच्या डीपीरोडचे डांबरीकरण, गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौक ते वाघ नगर, जि.प.चौक ते नेरीनाका स्मशानभूमीपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे शहरातील काही भागातील नागरिकांना खड्डयांपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, अद्याप या कामांसाठी निविदा देखील काढण्यात आली नसल्याने या कामांना केव्हा सुरुवात होईल आणि केव्हा रस्त्यांचे भाग्य उजाडणार ? याचा प्रतीक्षेत सामान्य जळगावकर आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव