शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

थर्डपार्टी आॅडीटच संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 22:09 IST

जलयुक्त शिवार योजनेत घोळ

ठळक मुद्देआॅडीट करणाºया संस्थेकडून न मागताच त्रुटी पूर्ततेचे अहवाल सादर आॅडीट तकलादू

जळगाव: जलयुक्त शिवार योजनेच्या दुसºया टप्प्यातील १३ कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे ‘ग्रीन होम’ या संस्थेने केलेल्या थर्डपार्टी आॅडीटमध्ये आढळून आल्याने संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. त्याची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांनी केली असता थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्रुटी दूर झालेल्या नसतानाही व संबंधीत विभागांकडून कुठलाही पत्रव्यवहार त्याबाबत झालेला नसतानाही त्रुटी पूर्ततेचे अहवाल दिले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅडीट’बाबतच संशय निर्माण झाला आहे.२०१९ पर्यंंत ‘सर्वासाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्टÑ’ ही संकल्पना घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्'ात २०१६-१७ मध्ये दुसरा टप्पा पार पडला. त्यात २२२ कामे २०१८ उजाडल्यावर पूर्ण झाली. या दुसºया टप्प्याचे थर्ड पार्टी आॅडीट एरंडोल येथील ‘ग्रीन होप’ संस्थेतर्फे करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार टप्पा २ मधील कृषी विभागाकडील ३, वनविभागाकडील २, जि.प.कडील २, मृद व जलसंधारण विभागाकडील ६ अशा १३ कामांमध्ये दोष आढळून आल्याचे नमूद करण्यात आले. या टप्पा २ मधील कामांमध्ये दोष आढळून आल्याने जिल्हा प्रशासनातर्फे संबंधीत विभाग प्रमुखांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या विभागप्रमुखांकडून खुलासे सादर झाले. त्या खुलाशांची पडताळणी रोहयोच्या उपअभियंत्यांमार्फत करण्यात येत असून तथ्य आढळल्यास संबंधीत अधिकाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र पडताळीचे काम सुरू होण्यापूर्वीच थर्ड पार्टी आॅडीट करणाºया संस्थेने त्यातील काही कामांच्या त्रुटी दूर करण्यात आल्या असल्याबाबतचा सुधारीत अहवाल सादर केला आहे. प्रत्यक्षात रोहयोच्या अभियंत्यांनी पडताळणी केली असता आधी काढलेल्या त्रुटींची पूर्तता मात्र झालेली नसल्याचे आढळून आले. तसेच संबंधीत संस्थेकडे काम करणाºया विभागाकडून त्रुटींची पूर्तता केल्याबद्दलचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नसतानाही हा त्रुटी पूर्ततेचा अहवाल देण्याचा खटाटोप संबंधीत संस्थेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या ‘थर्ड पार्टी आॅटीड’बाबतच साशंकता व्यक्त होत आहे.आॅडीट तकलादूजलयुक्त शिवारच्या दुसºया टप्प्यात ३३० कामे होती. त्यातील ३३ टक्केच कामे थर्डपार्टी आॅडीटसाठी देण्यात आली. मात्र संबंधीत विभागांनी चांगली झालेलीच कामे यासाठी दिली नसतील हे कशावरून? असा मुद्दा उपस्थित होत आहे. तसेच उर्वरीत ६७ टक्के कामे चांगल्याच दर्जाची झाली असतील, हे कशावरून? असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या थर्डपार्टी आॅटीडबाबत साशंकता निर्माण झाली आहे.अहवालातील त्रुटीया थर्ड पार्टी अहवालात वरखेड ता.भडगाव येथील तीन सिमेंट नालाबांधांबाबत एकसारखेच आक्षेप घेण्यात आले. त्यात खोलीकरण केले नाही. भराव करून खोलीकरण न केल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही, अशा स्वरूपाचे आक्षेप घेण्यात आले. मात्र शेºयामध्ये मात्र दोन बंधाºयांना कामे सूचनात्मक म्हणजेच दुरूस्ती करावी, असा शेरा असून तिसºया बंधाºयाला काम निकृष्ट झाल्याचा शेरा देण्यात आला आहे.सोनाली ता.जामनेर येथील तीन बांध बांधण्यात आले. त्यात हे बांध बुडीत क्षेत्रात येत असल्याचा येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र तीन महिन्याच्या आतच संस्थेने सुधारीत अहवाल देत त्यात नाल्याची दिशा वळविल्याने आता बुडीत क्षेत्रात येत नाही असे नमूद करण्यात आले. मात्र पडताळणीत मात्र नाल्याची दिशा बदललेलीच नसल्याचे आढळून आले. अन्य एका कामाबाबत पाणी बांधाचे पिचींग केलेले नसल्याचा आक्षेप होता. त्याच्या सुधारीत अहवालात मात्र त्रुटी दूर केल्याचे नमूद होते. प्रत्यक्षात पिचींग केलेलेच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संस्थेने सुधारीत अहवाल देण्याचा खटाटोप कशासाठी व कुणाच्या सांगण्यावरून केला? असा सवाल उपस्थित होत आहे.