शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

तिसऱ्या रेल्वे मार्गावरून १५ ऑगस्टपासून धावणार रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST

जळगाव : गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या ३४ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे १०० टक्के काम पूर्ण ...

जळगाव : गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या ३४ तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये तिसऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी पूर्णतः तयार झाला असून, येत्या १५ ऑगस्टपासून किंवा शक्य झाल्यास त्यापूर्वी या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच हा मार्ग सुरू झाल्यावर सुरतकडून येणाऱ्या सर्व गाड्या मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवरून न जाता नवीन तिसऱ्या मार्गावरूनच भुसावळला रवाना होणार आहेत.

भुसावळ रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते भादलीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर आता भादली ते जळगावदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण केले आहे. एकूण २४ किलोमीटरचा हा मार्ग असून, या तिसऱ्या अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे भुसावळ ते जळगावदरम्यान वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. या नवीन तिसऱ्या मार्गावर मार्चमध्ये रेल्वे प्रशासनाने १२० किलोमीटर वेगाने इंजिन चालवून, रुळांची चाचणी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात तब्बल ३४ तासांचा मेगा ब्लॉक घेऊन सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक कामही पूर्ण केले आहे. त्यामुळे जळगाव ते भुसावळ हा तिसरा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.

इन्फो :

सध्या सिग्नल यंत्रणेची चाचणी अंतिम टप्प्यात :

गेल्या आठवड्यात सिग्नल यंत्रणेचे काम १०० टक्के पूर्ण झाले असले तरी, सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम अपूर्ण होते. त्यामुळे या मार्गावर सध्या रेल्वेच्या दूरसंचार विभागातर्फे सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, या मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक स्वरूपाची आहे. त्यामुळे लोको पायलटला पाच किलोमीटर अंतरावरूनही कुठले सिग्नल चालू आहे आणि कुठले बंद आहेत. हे समजणार आहे.

इन्फो :

..तर भुसावळहून सर्व गाड्या मुख्य लाइनवरून जळगावला येणार :

सुरतहून जळगावला येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्स्प्रेस व मालगाड्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावरूनच भुसावळला रवाना करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, तर भुसावळहून जळगावकडे येणाऱ्या सुरत व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावरून न येता, मुख्य लाइनवरूनच जळगावला येणार आहेत. सध्या तयार झालेला तिसऱ्या रेल्वे मार्गाचा वापर फक्त सुरतकडून येणाऱ्या गाड्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावरून टप्प्याटप्प्याने इतर गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

इन्फो :

जळगाव ते भुसावळदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, सध्या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. तेही काम लवकरच पूर्ण होणार असून, शक्य झाल्यास १५ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला होईल. तसेच सुरुवातीला या मार्गावरून सुरतहून भुसावळला जाणाऱ्या गाड्या रवाना करण्यात येणार आहेत.

विवेककुमार गुप्ता, डीआरएम, रेल्वे विभाग, भुसावळ