शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तृतीयपंथीय समस्या निवारण समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तृतीयपंथीयांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तृतीयपंथीयांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण यावर चर्चा करण्यासाठी या समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्यात जिल्हाधिकारी राऊत यांनी यंत्रणांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रामपाल कोल्हे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, पोलीस विभागाचे प्रतिनिधी दिलीप चौधरी उपस्थित होते.

या बैठकीत तृतीयपंथीयांना रेशन कार्ड देण्याबाबत, उत्पन्न स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी व्यवसाय, बँकांकडून कर्ज पुरवठा करणे, तृतीयपंथीयांची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधणे, जिल्हा निवडणूक शाखेकडे उपलब्ध असलेली तृतीयपंथीय मतदारांची यादी प्राप्त करून घेणे, कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना आर्थिक साहाय्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात सध्या २४० तृतीयपंथी आहेत. त्यातील बँक खाते क्रमांक आणि आधारकार्ड धारक तृतीयपंथीयांची संख्या ३७ असल्याचे व त्यांना एकरकमी अर्थसाहाय्य द्यावयाचे झाल्यास तीन लाख साठ हजार रुपये आर्थिक भार येणार असल्याचे सदस्य सचिव योगेश पाटील यांनी बैठकीत सांगितले.

तृतीयपंथीयांच्या शारीरिक व आरोग्यविषयक समस्या सामान्यांपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या असल्याने सध्याच्या कोविड संसर्गाच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह निदान झालेल्या तृतीयपंथीयांना स्वतंत्र कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्ष असावेत, अशी मागणी या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था व संघटनांनी केल्याचे सदस्य सचिव यांनी बैठकीत सांगितले. त्यावर सध्या स्वतंत्र विलगीकरण कक्ष न करता सद्य:स्थितीत असलेल्या विलगीकरण कक्षात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा बेडची व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले.